HW News Marathi
राजकारण

आधी लोकल सेवा सुरक्षित करा | संजय निरुपम

मुंबई | बुलेट ट्रेनच्या गप्पा मारणा-यांनो आधी लोकल सेवा सुरक्षित करा, अशा शब्दात काँग्रेसने अंधेरीच्या गोखले पूल दुर्घटनेवरुन रेल्वेमंत्री पीयूष गोयलांवर निशाणा साधला. ‘रेल्वेमंत्री कधी पूल बांधण्यासाठी लष्कराला मुंबईत आणतात, तर कधी बुलेट ट्रेनच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जातात. हे सर्व करण्याआधी त्यांनी मुंबईकरांचा लोकल प्रवास सुरक्षित करावा,’ असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे.

मंगळवारी सकाळी अंधेरी स्थानकाजवळचा पादचारी पूलचा काही भाग 7 वाजून 45 च्या सुमारास कोसळला. पुलाचा बराचसा भाग रेल्वे रुळांवर कोसळल्यामुळे पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर याचा परीणाम झाल्याचे पहायला मिळत आहे. यावरुन काँग्रेसने सरकारवर निशाणा साधला. ‘बुलेट ट्रेनच्या गप्पा करण्याआधी मुंबईतील लोकल सेवा सुरक्षित करा. लोकल सेवा ही मुंबईकरांसाठी जीवन आहे. त्यामुळे मुंबईकरांचे जीवन सुरक्षित व्हायला हवे,’ असेही यावेळी बोलताना काँग्रेस नेते संजय निरुपम म्हणालेत.

https://twitter.com/MumbaiBandraE/status/1013981166255235072

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पालघरची स्वाभिमानी जनता कॉंग्रेसच्या उमेदवाराला विजयी करेल

News Desk

वर्षा गायकवाड यांचा पूरग्रस्त भागात दौरा, कार्यकर्त्यांनी वाजवले फटाके

News Desk

#LokSabhaElections2019 : नीरव मोदीला अटक झाली यात तुमचे कसले यश ?

News Desk