HW News Marathi
राजकारण

ईव्हीएमच्या मुद्द्यावरून शरद पवार, अजित पवार यांच्यातच मतभेद

मुंबई | राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सोमवारी (१० जून) मुंबईत पार परडलेल्या २० वा वर्धापनदिनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मात्र, याचवेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी त्यांच्या परस्परविरोधी विधान केले. “जिंकल्यावर ईव्हीएमवर संशय नसतो, मग पराभवानंतरच का ?” असा सवाल अजित पवार यांनी यावेळी केला. त्यामुळे, ईव्हीएमच्या मुद्द्यावरून शरद पवार आणि अजित पवार यांच्यात असलेले मतभेद पुन्हा एकदा उघड झाले आहेत. वर्धापनदिनी झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

“आता लोकसभेच्या निकालांवर चर्चा करण्यापेक्षा येत्या विधानसभेला प्रचंड मेहनत घेऊन, जीवाचं रान करून पक्षाच्या हितासाठी काम करा. जिंकल्यानंतर ईव्हीएमला दोष दिला नाही तर मग पराभवाचा दोष का द्यायचा ? या ईव्हीएमच्या मुद्द्यामुळे विधानसभेच्या कुठेही कमी पडू नका”, असे शरद पवार यांनी यावेळी कार्यकर्त्यांना सांगितले आहे.

अजित पवार यांनी यापूर्वीही ईव्हीएमबाबत शरद पवार यांच्या परस्परविरोधी विधान केले होते. “माझ्या मनात ईव्हीएमबाबत कोणतीही शंका नाही. ईव्हीएममध्ये जर दोष असता तर ५ राज्यांमध्ये भाजपचे सरकार गेले नसते. ईव्हीएमबाबत काहींच्या मनात अजूनही शंका आहे. मात्र, ही शंका लोकशाहीसाठी मारक आहे”, असे अजित पवार यांनी म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#MaharashtraElections2019 LIVE UPDATE | सेलिब्रिटींनीदेखील बजावला मतदानाचा हक्क

News Desk

कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत चौकशीसाठी हजर राहणार?

Aprna

अंधेरी पोटनिवडणुकीतील नाराजीच्या चर्चांवर काँग्रेसची प्रतिक्रिया

Manasi Devkar