HW News Marathi
राजकारण

युतीच गणितं अद्याप गुलदस्त्यात

मुंबई | सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना अशी सेना भाजपची अवस्था झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. बुधवारी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. एकूणचं ठाकरे शहा भेटीनंतर दोन्ही पक्षांना एकमेकांची किती आणि काय गरज आहे हे स्पष्ट झालेच आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने विचार करुन मित्र पक्ष असलेल्या सेनेची नाराजी दुर करण्यासाठी अमित शहा यांनी एक पाऊल पुढे टाकल्याचे यावेळी पहायला मिळाले.

परंतु उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात झालेल्या भेटीत २ तास नक्की काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे. गुरुवारच्या दैनिक सामनात शिवसेना नेते व खासदार असलेल्या संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आगामी निवडणुक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे परंतु अमित शहा यांच्या भेटीनंतर सेना भाजप मनोमिलन झाले का ? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे.

मातोश्रीवर झालेल्या भेटीत भाजप अध्यक्ष अमित शहा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि युवासेना अध्यक्ष अदित्य ठाकरे सहभागी होते. या भेटीचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे जवळपास अर्धा तास शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद दार आड जी चर्चा झाली त्यातच आगामी काळात युतीचे भविष्य अवलंबून असणार आहे.

शहा, ठाकरे यांच्या भेटीमागील कारणे :

  • मागील चार वर्षांत पोटनिवडणुकीत झालेले पराभव
  • पालघर पोटनिवडणुकीत शिवसेनेने दाखवलेली ताकद
  • मागील चार वर्षांत पोट निवडणुकांमध्ये बहुतांश जागी झालेला पराभव
  • विरोधात जाउन बसलेले घटक पक्ष
  • भाजपा विरोधात एकवटलेले विरोधक
  • हिंदु मतांची होणारी फुट

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनगर समाजाला आदिवासी समाजाप्रमाणे सवलती मिळणार | मुख्यमंत्री

News Desk

राजनाथ सिंग यांनी केला केजरीवाल यांना फोन

News Desk

#MeToo : केंद्रीय मंत्री एम जे अकबर यांचा अखेर राजीनामा

News Desk