HW News Marathi
राजकारण

शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी शिवतीर्थावरच होणार !

मुंबई | “विधानसभेचे निकाल लागून १० दिवस होत आलेले आहेत. तरीही राज्यातील सगळ्यात मोठा सिंगल लार्जेस्ट पार्टी असलेला पक्ष अद्याप सत्तास्थापनेचा दावा करू शकलेला नाही. माझ्या माहितीप्रमाणे फक्त मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीसाठी त्यांनी वानखेडे स्टेडियम, महालक्ष्मी रेसकोर्स बुक केला आहे. आता किती ठिकाणी शपथविधी होणार आहेत, ते मला माहिती नाही. पण, आमच्या (शिवसेनेच्या) मुख्यमंत्र्यांचा शपथविधी मात्र शिवतीर्थावर होईल”, असा स्पष्ट दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सध्या राज्यात सत्तास्थापनेवरुन मोठा संघर्ष सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज (३ नोव्हेंबर) पुन्हा माध्यमांशी संवाद साधताना काही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

निवडणुकीच्या निकालानंतर अमित शहांनी महाराष्ट्र लक्ष घातले नाही !

“हरियाणासारख्या लहान राज्याच्या सत्तास्थापनेचा प्रश्न सोडविण्यासाठी अमित शहा यांनी ज्या प्रकारे पुढाकार घेतला. त्याप्रकारचे पुढाकार महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याच्या सत्तास्थापनेचा तिढा सोडविण्यासाठी मात्र अमित शाह यांनी घेतला नाही हे मोठं रहस्यमय आहे. मी जेवढे अमित शहांना ओळखतो, ते एक स्ट्रेट फॉरवर्ड नेते आहेत. ज्या गोष्टी ठरलेल्या असतात त्या स्वीकारून पुढे जाणारे ते नेते आहेत. परिस्थितीचे गांभीर्य समजून अमित शाह लोकसभेच्या वेळी मातोश्रीवर चर्चेसाठी आले. मात्र, निवडणुकीच्या निकालानंतरच्या काळात अमित शहांनी महाराष्ट्र लक्ष घातले नाही”, असे यावेळी म्हणत संजय राऊत यांनी अमित शहांचे कौतुक करत त्यांच्याबद्दल काहीशी नाराजी देखील व्यक्त केली.

शरद पवार हे देशाच्या पंतप्रधानपदाचे दावेदार !

“शरद पवार हे देशाच्या पंतप्रधानपदाचे दावेदार आहेत. शरद पवार यांनी अनेकदा स्वतःहून असे सांगितलं आहे कि, मी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा येणार नाही. शरद पवार हे देशाचे नेते आहेत. मग ते कोणत्याही पदावर असोत किंवा नसोत. शरद पवारांसाठी आता पद लहान आहे आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व मोठं आहे. ते दुसऱ्या पक्षाचे नेते असले तरीही माझी हे मान्य करण्यास कोणतीही हरकत नाही. शरद पवार हे देशाचे नेते आहेत”, असे म्हणत यावेळी शरद पवारांचे कौतुक करताना संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा देखील प्रयत्न केला आहे.

महाराष्ट्रात आता ‘ऑपरेशन कमळ’ चालणार नाही !

“कर्नाटकमध्ये सरकारस्थापन करताना ‘ऑपरेशन कमळ’बद्दल काही पुरावे आता बाहेर आले. सत्तास्थापनेसाठी तिथे कोणकोणत्या गोष्टींचा कसा कसा वापर झाला याबाबत येडियुरप्पा यांनी काही गोष्टी मान्य केल्या. दरम्यान, कर्नाटकमध्ये जे झालं ते आता महाराष्ट्रात होणार नाही. महाराष्ट्रात आता ‘ऑपरेशन कमळ’ चालणार नाही. कारण, आता महाराष्ट्र मनाने, विचाराने मुक्त झाला आहे”, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजप, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुढच्या वेळी ते १००% मुख्यमंत्री नसतील !

swarit

धनगर आरक्षणाबाबत राज्य सरकारकडून शिफारस नाही, केंद्राचा धक्कादायक खुलासा

News Desk

तुम्ही स्वतःला ‘गांधी’ समजण्याची घोडचूक करूच नये !

News Desk