HW News Marathi
राजकारण

हिंमत असेल तर आमचे आमदार फोडून दाखवावेत !

मुंबई | विधानसभेच्या निकालानंतर राज्यात निर्माण झालेला सत्तासंघर्षाचा तिढा काही सुटण्याचे नाव घेत नाही. याच पार्श्वभूमीवर आज (७ नोव्हेंबर) थोड्याच वेळापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेच्या सर्व विजयी आमदारांची ‘मातोश्री’वर बैठक पार पडली. या बैठकीनंतर शिवसेनेच्या काही आमदारांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिल्या. यावेळी बोलताना शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना थेट भाजपला आव्हान दिले आहे. “आमदार म्हणजे भाजीपाला नाही. हिंमत असेल तर त्यांनी आमचे आमदार फोडून दाखवावेत”, असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी भाजपला इशारा दिला आहे.

विधानसभेच्या निकालानंतर राज्यात शिवसेना-भाजपमध्ये मोठा सत्तासंघर्ष पाहायला मिळत आहे. राज्यातील जनतेने स्पष्ट बहुमताचा कौल देऊनही मुख्यमंत्रीपद आणि जागावाटपाच्या मुद्द्यावरून भाजप-शिवसेनेला अद्याप राज्यात सरकार स्थापन करता आलेले नाही. याच पार्श्वभूमीवर आता भाजपकडून सरकार स्थापनेसाठी धडपड सुरु असून शिवसेनेसह अन्य पक्षांच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न देखील भाजपकडून होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटील यांनी भाजपला इशारा दिला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील आज (७ नोव्हेंबर) याच पार्श्वभूमीवर भाष्य केले. “शिवसेनेचे आमदार फुटणार नाहीत. शिवसेनेच्या वाऱ्यालाही उभे राहण्याची कोणाची हिंमत नाही. शिवसेनेच्या आमदारांची संपर्क करण्याची कोणाचीही हिंमत नाही. आमचे आमदार फोडून दाखवाच”, असे स्पष्ट आव्हान संजय राऊत यांनी भाजपला दिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रकाश मेहता यांच्या चौकशीवरील निर्णय तात्काळ द्या, काँग्रेसची मागणी

News Desk

निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, हिंसाचारमुळे उद्यापासून पश्चिम बंगालमधील प्रचारबंदी

News Desk

नागपुरातील हिवाळी अधिवेशन 30 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार

Aprna