मुंबई | पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी 8 तारखेच्या मध्यरात्रीपासून अचानक कामबंद आंदोलन सुरु केले आहे. ते आंदोलन अद्यापही सुरुच आहे परंतु अचानक काम बंद आंदोलन केल्याने सुट्टीवरुन घरी परतणाऱ्या प्रवाशांचे खूप हाल झाले. तर अचानक काम बंद करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात एसटी प्रशासनाने कारवाईचा निर्णय घेतलाय.
राज्यभरात शेकडो कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले असून एकट्या बीड जिल्ह्यात जवळपास 121 जणांना सेवेतून तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. तर यवतमाळ जिल्ह्यातील एकूण 9 आगारातील 46 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर निलंबन झाली तरी संप सुरुच ठेऊ, असा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.