HW News Marathi
राजकारण

“दिल्ली तुम्ही घ्या, गुजरात आम्हाला सोडा”, संजय राऊतांचा भाजप आणि ‘आप’वर गंभीर आरोप

मुंबई | “दिल्ली तुम्ही घ्या, गुजरात आम्हाला सोडा, असे काही तरी झाले असावे, अशी लोकांना शंका आह”, असा आरोप ठाकरे गटाचे आमदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गुजरात विधानसभेचा निकालावरून भाजप आणि आपवर केला आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालसंदर्भात बोलताना त्यांनी भाजप आणि आपवर टीका केली आहे. तर आगामी निवडणुकीत विरोधक एकत्र आले तर 2024 मध्ये परिवर्तन होईल, असा विश्वास राऊतांनी आज (8 डिसेंबर) माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.

 

संजय राऊत गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात बोलताना म्हणाले, “गुजरातचा निकाल हा अपेक्षित आहे. गुजरातमध्ये जर आप आणि अन्य पक्षांनी एकत्र येवून काही आघाडी केली असती किंवा ऐकमेकांना समजून घेतले असते. तर नक्कीच ज्याला आपण ‘काटे की टक्कर’ म्हणतो, ती द्यावी लागली असती. पण, दिल्ली तुम्ही घ्या, गुजरात आम्हाला सोडा, असे काही तरी झाले असावे, अशी लोकांना शंका आहे. हिमाचल प्रदेशमध्ये अपेक्षेप्रमाणे काँग्रेसने चांगली लढत दिली आहे. आणि हे चित्र आशादायीआहे.”

 

तीन विरूद्ध एक असा समाना

 

“तीन प्रमुख निवडणुकांमध्ये गुजरात भाजपला मिळाले आहे. दिल्ली हातातून गेलेय. हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला संघर्ष करावा लागतोय, मग काँग्रेस जिंकले. म्हणजे तीन विरूद्ध एक असा समाना झाला आहे”, असा टोलाही राऊतांनी भाजपला लागवला. राऊत पुढे म्हणाले,  “गुजरातच्या विजयाबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतोय. आपला सुद्धा दिल्लीसाठी अभिनंदन करतोय. आणि हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस ज्या पद्धतीने लढतेय. लहान राज्य असेल तरी हे एक प्रातिनिधीक असा निर्णय आहे. हिमाचलमधील लढतीयसाठी काँग्रेसचेही अभिनंदन करावे लागेल. अजूनही लोकांना वाटते की, हिमाचलमध्ये काँग्रेसची सत्ता येईल”, असेही ते म्हणाले.

 

विरोधक एकत्र आले तर 2024 मध्ये परिवर्तन होईल

 

“देशाच्या पुढील निवडणुकांसाठी आशादायक चित्र आहे. फक्त विरोधकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. मतविभागीन टाळणे गरजेचे आहे. आपासातील मदभेद हेवेदावे आणि अहंकार यांना दूर ठेवून जर एकत्र लढाई केली. तर 2024 साली देशामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीचे हे निकाल आहे. किंबहुना गुजरातमध्ये लोकसभेत सर्व जण एकत्र येवून लढले तर सुद्धा लोक परिवर्तन होईल”, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्ली राज्य मनोज तिवारींच्या बापाचे आहे का ?, केजरीवालांची जीभ घसरली

News Desk

साध्वी प्रज्ञाच्या रोड शोदरम्यान गोंधळ, एनसीपी कार्यकर्त्यांनी दाखविले ‘काळे झेंडे’

News Desk

वादग्रस्त विधान करण्याचा राज्यपालांचा लौकिक; समाजात गैरसमज वाढेल कसा हेच मिशन! – शरद पवार

Aprna