HW News Marathi
राजकारण

महाआघाडीचा निर्णय १० डिसेंबरला ?

नवी दिल्ली | आगामी लोकसभा निवडणुकीला अवघ्ये पाच महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. सध्याच्या मोदी सरकारला निवडणुकीत टक्‍कर देण्यासाठी विरोधी पक्षांसह सर्व पक्ष पुन्‍हा एकत्र येत आहेत. टीडीपीचे नेते आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी सांगितले आहे की, महाआघाडीचा अजेंडा ठरवण्यासाठी येत्‍या १० डिसेंबर रोजी विरोधी पक्षातील प्रमुखांची बैठक होणार आहे.

टीडीपी नेत्यांनी यावेळी आम्‍हाला फक्‍त निवडणुकीसाठी पंतप्रधान नको आहे. जे पंतप्रधान फक्‍त निवडणुकीचा प्रचार करतात असे पंतप्रधान आम्‍हाला नको आहेत. देशात नवे बदल आणणारा आणि बदल घडवणारा पंतप्रधान आम्‍हाला हवा असे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्‍पष्ट केले.

मागील काही महिन्‍यांपासून चंद्रबाबू नायडू भाजप विरोधी पक्षातील नेत्यांसोबत चर्चा करीत आहेत. मागील काही दिवसापूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्‍वामी, माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममत बॅनर्जी, बसपा अध्यक्ष मायावती, सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव , डीएमकेच एम. के. स्‍टालिन, दिल्‍लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी चर्चा केली आहे. येत्या १० डिसेंबर रोजी होणार्‍या बैठकीसाठी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, जनता दल (सेक्यूलर), बसपा, सपा, आप पक्षाचे वरिष्ठ नेते या बैठकीला हजर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भाजपला मतदान करू नका, बॉलिवूडमधील ६०० दिग्गज कलाकारांचे आवाहन

News Desk

कुमारस्वामी घेणार सोनिया गांधींची भेट, मंत्रीमंडळाबाबत चर्चेची शक्यता  

News Desk

केरळमधील काँग्रेसचे खासदार एम.आई. शानवास यांचे निधन

News Desk
राजकारण

राहुल गांधींनी जवानांचा अपमान केला | अमित शहा

News Desk

उदयपूर | उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक केले, असे बोलून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी भारतीय लष्कराच्या जवानांचा अपमान केला असल्याचा आरोप भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी राजस्थान मधील प्रचारसभेत केला.

या प्रसाच सभेत शहा म्हणाले की, अशी विधाने करण्यापूर्वी राहुल गांधी यांनी भारतीय जवानांच्या हौतात्म्याचा तरी विचार करायला हवा होता. भारतीय लष्कराला आकार देण्याचे, देशात राष्ट्रभक्तीचे वातावरण तयार करण्याचे काम पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वामुळे शक्य झाले आहे.

आपल्यामागे पंतप्रधान व केंद्र सरकार ठामपणे उभे असल्याचा विश्वास लष्करातील जवानांमध्ये मोदी यांच्यामुळे निर्माण झाला आहे. त्यांना या केंद्र सरकारचा व पंतप्रधानांचा अभिमान वाटतो, असे असताना राहुल गांधी या जवानांचा अपमान करीत आहेत, असा आरोप शहा यांनी केला आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात आम्हीही सर्जिकल स्ट्राइक केले होते, असे राहुल सांगत आहेत. परंतु त्याची तुम्हाला माहिती आहे का, असा प्रश्न विचारून शहा यांनी काँग्रेसच्या सर्जिकल स्ट्राइकवर शंका व्यक्त केली.

 

Related posts

मुख्यमंत्री आणि आंबेडकरांनी भेटीमागचे सांगितले खरे कारण

Aprna

राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिकेत तटकरेंना उमेदवारी

News Desk

कोल्हापूर जिल्ह्यातील 19 ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर; 12 ग्रामपंचायतीमध्ये भाजपचा बोलबाला

Aprna