HW News Marathi
राजकारण

देशातील जवान शहीद होत असताना पंतप्रधान त्यांचा पीआर करण्यात व्यस्त !

धुळे | देशातील जवान शहीद होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा पीआर करण्यात व्यस्त असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल यांनी आज (१ मार्च) धुळेत जाहीर सभेत घेण्यात आली होती. देशातील जनतेला फसविणार्‍या विजय माल्यासारख्या उद्योगपतींचे कर्ज माफ होऊ शकते. परंतु कर्जामुळे आत्महत्येचा मार्ग पत्करणार्‍या शेतकर्‍यांना कर्जमाफी देताना मोदी यांचे हात का आखडतात, असा सवाल राहुल यांनी जाहीर सभेत उपस्‍थित केला आहे.

“मोदींचे प्रत्येक भाषण म्हणजे निवडणूकच्या आधीचा जुमला असतो. देशातील दोन कोटी लोकांना रोजगार देणार असल्याची घोषणा मोदींनी केली होती. मी लोकसभेत विचारले की, तुमच्या सरकारने आतापर्यंत किती जणांना रोजगार दिला. परंतु त्यांच्या एकाही मंत्र्यांने उत्तर दिले नाही. मोदींनी शेतकरी, युवक आणि सर्व सामान्य जनतेचा भ्रमनिरास केला आहे. काळे धन बाहेर येण्यासाठी नोटबंदी केली मग काळे धन गेले कोठे? उद्योगपतींचे कर्ज माफ करणार्‍या या सरकारला देशातील शेतकर्‍यांशी काहीच देणे घेणे नाही, ” अशा शब्दात राहुल गांधी यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले.

मध्यप्रदेशात काँग्रेसने सत्तेवर येताच कर्जमाफी केली. अशीच कर्जमाफी प्रत्येक राज्यातील शेतकर्‍यांना देण्याचे आश्‍वासन राहुल गांधी यांनी धुळेच्या भाषणात म्हणाले आहे. धुळे येथे आयोजित केलेल्‍या काँग्रेसच्या सभेत राहुल गांधी बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे, उल्हास पाटील, माजी मंत्री हेमंत देशमुख, शोभाताई बच्छाव, तुषार शेवाळे उपस्‍थित होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Elections2019 : जाणून घ्या…नाशिक मतदारसंघाबाबत

News Desk

काँग्रेसने चॅकलेट चेहरा राजकारणात आणला !

News Desk

अण्णासाहेब मायकर व्हायरल ऑडिओ क्लीपवर विनायक मेटेंच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया

Aprna