HW News Marathi
राजकारण

…मग शेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन का नाही ?

नवी दिल्ली | सरकारने देशातील शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे. जीएसटीसाठी मध्यरात्री संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्यात आले. यासाठी दोन्ही सभागृह एकत्र आली आणि जीएसटीला मंजुरी मिळाली. तर मग शेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन का नाही ?, असा थेट सवाल खासदार राजू शेट्टींनी केला आहे.

शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याच्या संतापातून देशभरातून हजारो शेतकरी गुरुवारी दिल्लीतील रामलीला मैदानात दाखल झालेत खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आज संसदेला घेराव घालणार आहेत. खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संसदेला घेराव घालणार आहेत. या शेतकरी मोर्चाला संबोधित करताना खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला लक्ष्य केले आहे.

“सरकारने देशातील शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले नाही तर येत्या लोकसभा निवडणुकीत लाल किल्यावरुन भाषण करणारे पंतप्रधान कोण असतील हे देशातील शेतकरीच ठरवतील”, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला आहे. त्याचप्रमाणे “शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणाऱ्यालाच शेतकरी पाठिंबा देतील. तर शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्याचे नुकसानच होईल”, असेही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

गॅस दरवाढीवरुन ‘मविआ’चे आमदार आक्रमक; विधानभवनाच्या पायर्‍यांवर सरकार विरोधात घोषणाबाजी

Aprna

मुंबईचा जोशीमठ झाला तर कोण जबाबदार?; आदित्य ठाकरेंचे ‘शिंदे सरकार’ला रोखठोक सवाल

Aprna

शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाची बैठक संपन्न

Aprna
व्हिडीओ

शेतकरी आज संसद भवनाला घालणार घेराव

Atul Chavan

कर्जमाफी आणि शेतमालाच्या खर्चावर दीडपट हमीभाव या दोन प्रमुख मागण्यांसाठी देशभरातील हजारो शेतकरी संघटना गुरुवारी पुन्हा दिल्लीत दाखल झाल्या आहेत. दिल्लीत दाखल झालेल्या शेतक-यांनी शुक्रवारी संसदेवर मोर्चा काढला आहे.

अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या माध्यमातून सर्व शेतकरी संघटना एकत्र आले आहेत. या मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर राजधानी दिल्लीत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गुरुवारी दिल्लीत आलेला हा मोर्चा रामलीला मैदानात स्थिरावला होता. शुक्रवारी येथून संसदेकडे मोर्चा रवाना झाला आहे. यापूर्वीही दिल्लीत शेतकर्‍यांनी रामलीला मैदानावर आंदोलन करून सरकारचे लक्ष आपल्या मागण्यांकडे वेधले होते. मात्र, सरकारशी चर्चा करून आंदोलन स्थगित करूनही मागण्या मान्य न झाल्याने पुन्हा शेकऱ्यांनी या मोर्चाचे आयोजन केले आहे.

Related posts

Pune | दुर्दैवी घटना, जबाबदार कोण ?

Atul Chavan

2022 च्या Budget कडून गृहिणींच्या ‘या’ आहेत अपेक्षा

News Desk

जलयुक्त शिवार योजना हाच भ्रष्टाचार !

News Desk