HW News Marathi
राजकारण

यापुढे युती नाही | उद्धव ठाकरे

मुंबई | पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत सेना भाजपाचे शाब्दिक युद्ध रंगल्याचे पहायला मिळाले होते. या निवडणुकीत पराजय झाल्यानंतर सेना सत्तेतून बाहेर पडणार असल्याच्या अफवांना उधान आले होते. त्यातच शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केल्यामुळे सोशल मिडीयावर अफवांनी जोर धरला होता. परंतु पत्रकार परिषदेत यापुढील कोणत्याही निवडणुकीत युती नाही अशी घोषणा पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी केली. मात्र पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना वारंवार तुम्ही सरकारमध्ये आहात का ? असा प्रश्न विचारल्यानंतर आजचा दिवस लोकशाही वाचविण्याचा आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मूळ प्रश्नाला बगल दिली.

काय म्हणालेत उद्धव ठाकरे

  • पालघरच्या मतदारांना उद्धव ठाकरेंचे आश्वासन ‘शिवसेना तुमच्या सोबत राहील
  • निवडणूक प्रचारात शिवसेनेने दिलेल्या शब्दापासून मागे जाणार नाही
  • जनतेच्या भावना जवळून पाहिल्या
  • साम-दाम-दंड-भेद वापरुन निसटता पराभव केला गेला
  • मी पराभव मानायला तयार नाही, पराभव जाहीर झाला
  • मतदान यंत्राबाबत धोरण आहे की नाही?
  • उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेमध्ये दाखवला फोटो
  • तोच’व्यक्ती भाजप उमेदवाराच्या विजयी मिरवणुकीत होता
  • पकडणारे कार्यकर्ते भाजपच्या नेत्यांचे नाव घेत होते
  • मतदानाच्या दरम्यान पैसे वाटताना काही जणांना पकडले
  • लाखभर मतं कशी वाढली, याचा पुरावा द्या उद्धव ठाकरेंची मागणी
  • निवडणूक आयुक्तांची नेमणूक नको, निवडणूक हवी
  • सर्व पक्षांनी निवडणूक आयोगावर केस केली पाहिजे
  • निवडणूक आयोगाच्या भोंगळ कराभाराची करुन दिली आठवण
  • शिवसेनाप्रमुखांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला होता
  • २०१९ मध्ये आयपीएल प्रमाणे निवडणूक घेणार का?
  • हवामानाचा अंदाज निवडणूक आयोगाला नव्हता का? EVM मधील घोळावर उद्धव ठाकरेंची जोरदार टीका
  • मुख्य निवडणूक आयुक्तांचा यंत्रणेवर ताबा आहे की नाही? उद्धव ठाकरेंचा भाजपला खणखणीत सवाल
  • शिवरायांचा अपमान भाजपला मान्य आहे का?
  • शिवरायांच्या अपमानाबाबत भाजपकडून खुलासा नाही
  • जेमतेम काही हजारांनी भाजपचा विजय
  • घराघरामध्ये शिवसेना पोहचली
  • पालघरच्या जनतेला धन्यवाद, शिवसैनिकांना धन्यवाद
  • वनगा परिवाराला न्याय देण्यासाठी शिवसेना ताकदीने लढली
  • पालघरची निवडणूक शिवसेनेने पहिल्यांदाच लढली
  • उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला सरकार चार वर्षातच खाली आले
  • २५ वर्ष सरकार जाणार नाही असे वातावरण होते
  • २०१४ च्या निवडणुकीनंतर देशात वेगळे वातावरण होते
  • ११ पैकी २ जागा सोडल्या तर सर्वत्र भाजपचा पराभव
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेस नेता ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला उधाण

News Desk

आता १२ वी पर्यंतचे शिक्षण मोफत होण्याबाबत मोदी सरकारकडून नवी घोषणा ?

News Desk

‘आम्ही नाही त्यातले’ अशी शिवसेनेची भूमिका !

News Desk