HW News Marathi
राजकारण

२०१४ मध्ये अशा झाल्या होत्या लोकसभा निवडणुका

मुंबई | लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रक आज (१० मार्च) जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगाने आज सायंकाळी ५ वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत वेळापत्रका बरोबरच किती टप्प्यात निवडणुका होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागेल आहे. पाच वर्षापूर्वी २०१४च्या लोकसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने ५ मार्च रोजी केली होती. त्यावेळी देशभरात ९ टप्प्यांमध्ये निवडणुका घेण्यात आल्या होत्या. तर ९ मे रोजी लोकसभेचे निकाल लागले होते.

तसेच महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागांसाठी ३ टप्प्यात निवडणुका घेण्यात आल्या होत्या. १० एप्रिल रोजी पहिला टप्प्यात निवडणुका घेण्यात आल्या असून या टप्प्यात १० जागांवर निवडणुका झाल्या होत्या. तर दुसऱ्या टप्प्यात १७ एप्रिल रोजी १९ जागा आणि तिसऱ्या टप्प्यात १९ जागांवर निवडणूक पार पडली होती. २०१४च्या निवडणुकीनुसार यावेळी देखील महाराष्ट्रात तीन टप्प्यात निवडणुका होण्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता शिवसेनेची यादी देखील मुख्यमंत्रीच तयार करतील !

News Desk

उर्मिला मातोंडकर यांच्यावर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप

News Desk

बीकेसीवरील मेळाव्यात एकनाथ शिंदेंनी वाचली भारतीय जनता पक्षाची स्क्रिप्ट! –  नाना पटोले

Aprna