HW News Marathi
राजकारण

यंदा भीमा-कोरेगाव विजय दिवसासाठी प्रशासनाकडून चोख बंदोबस्त

पुणे | भीमा-कोरेगाव विजय दिवशी एसआरपीएफच्या १२ तुकड्या, १२०० होमगार्ड व २००० समता सैनिक दलाचे स्वयंसेवकांसह कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यंदा प्रशासनाकडून १ जानेवारी २०१७ रोजी भीमा-कोरेगाव विजय दिवसाच्या निमित्ताने चोख व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. गेल्या वर्षी भीमा-कोरेगाव येथे उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर या वर्षी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून मोठी खबरदारी घेतली जात असल्याचे दिसत आहे.

“भीमा-कोरेगाव विजय दिवसासाठी प्रशासन सज्ज असून यावेळी घातपात विरोधी पथक देखील तैनात करण्यात आले आहे. यावेळी जे लोक जातीय मुद्दे उकरून काढून असंतोष निर्माण करण्याच्या प्रयत्न करतील त्यांच्यावर लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येईल”, असे विश्वास नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

भीमा-कोरेगाव १ जानेवारी २०१७ रोजी झालेल्या दंगलीत मोठा हिंसाचार उसळलेला होता. या दंगलीचा तीव्र परिणाम संपूर्ण राज्यात पाहायला मिळाला होता. दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी भीमा-कोरेगाव येथील विजय स्तंभाच्या जागेचा ताबा राज्य सरकारकडे देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. १२ जानेवारीपर्यंत हा ताबा राज्य सरकारकडेच असणार आहे. विजय स्तंभाच्या जागी ३० डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“विधान परिषदेत मविआची विकेट पडेल; भाजपची नाही”, चंद्रकांत पाटलांचा दावा

Aprna

भाजपच्या तिसऱ्या उमेदवार यादीत महाराष्ट्रातील ६ उमेदवारांचा समावेश

News Desk

राष्ट्रवादीच्या पुण्यातल्या सभेत भुजबळ रहाणार उपस्थित

News Desk
मनोरंजन

संदीप कुलकर्णी आता निर्मात्याच्या भूमिकेत

News Desk

मुंबई | समर्थ अभिनयानं स्वतःची ओळख निर्माण केलेला अभिनेता संदीप कुलकर्णी आता निर्मात्याच्या भूमिकेत दिसणार आहे. संदीपने स्वतःची करंबोला क्रिएशन्स या निर्मिती संस्थेची स्थापना केली असून, “डोंबिवली रिटर्न” हा या निर्मिती संस्थेचा पहिला चित्रपट आहे.

श्वास, डोंबिवली फास्ट, ट्रॅफिक सिग्नल, अजिंक्य अशा अनेक चित्रपटांमुळे संदीपची अभिनेता म्हणून ओळख निर्माण झाली. मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही संदीपने लक्षणीय काम केलं. मात्र, “डोंबिवली फास्ट” या चित्रपटातील माधव आपटे ही भूमिका विशेष गाजली. सर्वसामान्य माणसाचा असामान्य प्रवास या चित्रपटातून समोर आला. समीक्षकांसह प्रेक्षकांनीही या चित्रपटाला डोक्यावर घेतलं. अभिनेता म्हणून भूमिकेचे कंगोरे उलगडणारा संदीप आता निर्मिती संस्थेच्या माध्यमातून उत्तमोत्तम कलाकृती घडवण्यासाठी सज्ज आहे. आशयसंपन्नेसह प्रेक्षकांना आवडतील असे चित्रपट निर्मिती संस्थेच्या माध्यमातून येत्या काळात निर्माण केले जाणार आहेत.

मी आणि माझे मित्र महेंद्र अटोले आम्ही दोघांनी मिळून “कंरबोला क्रिएशन्स” या निर्मिती संस्थेची स्थापना केली. त्यांना चित्रपटांमध्ये, विशेषतः चांगल्या आशय निर्मितीमध्ये रस आहे. आम्हा दोघांची आवड सारखीच असल्यानं आम्ही दोघं एकत्र येऊन निर्मिती संस्था सुरू केली. आमचा पहिला चित्रपट आहे “डोंबिवली रिटर्न…”.

“डोंबिवली रिटर्न” ही आजच्या काळातली गोष्ट आहे. एका मध्यवर्गीय कुटुंबाची, सर्वसामान्य माणसाची गोष्ट आहे. “डोंबिवली रिटर्न” हा सायकोलॉजिकल थ्रिलर प्रकारातील चित्रपट आहे. त्याचा पट खूपच मोठा आहे, असं संदीपनं सांगितलं असून नवीन वर्षी फेब्रुवारी महिन्यात हा चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Related posts

जय मल्हार फेम देवदत्तनेही मांडली रस्त्याची व्यथा

News Desk

विंकवर 2018 मध्ये लोकप्रिय ठरलेल्या मराठी गाण्यांची यादी जाहीर

News Desk

बॉलिवूड अभिनेत्री ईशा कोप्पीकरचा भाजपमध्ये प्रवेश

News Desk