HW News Marathi
राजकारण

महिला आहे म्हणून नव्हे तर सत्तेत आहे म्हणून ट्रोलिंग !

मुंबई | “आमच्या सरकारने कायमच विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. आम्ही जनतेच्या पाठिंब्यानेच लढू. जनतेचा पंतप्रधानांवर संपूर्ण विश्वास आहे”, असा विश्वास केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी व्यक्त केला आहे. यावेळी स्मृती इराणींनी काँग्रेसवर देखील टीका केली आहे. “अमेठी मतदारसंघात गांधी घराण्याच्या चार पिढ्या येथील शेतकऱ्यांचे भले करू शकल्या नाहीत. तर मग ते देशातील शेतक-यांचे भले काय करणार ?”, असा बोचरा सवाल स्मृती इराणी यांनी केला आहे.

सोशल मीडियावरील ट्रोलिंगबाबत बोलताना स्मृती इराणी म्हणाल्या कि, “महिला आहे म्हणून नव्हे तर सत्तेत आहे म्हणून ट्रोलिंग होते.” “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये मला राज्यसभा खासदार केले. त्यानंतर माझ्यावर मनुष्यबळ विकासमंत्री पदाची जबाबदारी सोपविली. सत्याची सेवा करणे हे माझे कर्तव्य आहे. सध्या राजकारणात महिला केंद्रस्थानी आहेत. तीन दशकांपूर्वी ज्यावेळी सुषमा स्वराज, सुमित्रा महाजन यांनी राजकारणात काम सुरू केले त्यावेळची परिस्थिती फार कठीण होती. आता आमच्या मदतीला समाजमाध्यमे आहेत”, असे स्मृती इराणी यावेळी म्हणाल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार मोठी घोषणा

News Desk

विरोधकांचे फोन टॅप करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही !

News Desk

 कन्हैय्या कुमारसह १० जणांवर आरोपपत्र दाखल

News Desk