HW News Marathi
राजकारण

मी राजकारण सोडून देईन !

मुंबई | “प्रकाश आंबेडकरजी आरएसएसला कायद्याच्या चौकटीत कसे आणायचे याचा मसुदा आपण द्या. महाराष्ट्रातील आघाडीच्या सर्व नेत्यांच्या सह्या आणण्याची जबाबदारी मी घेतो. तुम्ही दिलेल्या मसुद्यावर जर सह्या झाल्या नाहीत तर मी राजकारण सोडून देईन पण आघाडीत बिघाडी करू नका,” असे स्पष्ट मत ट्विट करून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मांडले आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने २३ फेब्रुवारी रोजी मुंबई यथे महासभा पार पडली होती. या महासभेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे नेते ओवेसी यांची या सभेला प्रमुख उपस्थिती होती. या सभेत बोलताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की, काँग्रेस धर्मनिरपेक्ष व्हावे, आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणल्याशिवाय पर्याय नाही, अशा प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. आंबेडकरांच्या याटीकेला प्रत्युत्तर म्हणून आव्हाड यांनी ट्विट करून उत्तर दिले आहे. आव्हाड यांच्या ट्वीटनंतर प्रकाश आंबेडकरांनी आघाडीबाबात राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सप-बसपच्या आघाडीने मोदींची झोप उडाली

News Desk

अमित शहांनी सहकुटुंब घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

Aprna

…नाहीतर त्यांनी माझ्या नेतृत्त्वाखाली काम करावे | रामदास आठवले

News Desk