HW News Marathi
राजकारण

आधी माझ्या शेतकऱ्यांचे काय करता ते बोला !

बीड | आगामी लोकसभा निवडणुकीत युतीची चर्चा करण्याआधी माझ्या शेतकऱ्यांचे काय करता ते बोला, तुमचे दिवस आता कमी राहिलेत तरी किती? असा सवाल करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे आज (९ जानेवारी) यांनी बीडमध्ये घेतलेल्या सभेत ते बोलत होते. ठाकरे हे एक दिवसाच्या मराठवाडा दौऱ्यावर यावेळी ते बोलत होते.

ठाकरे आजपासून बीड आणि जालन्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात शिवसेनेकडून दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना पशुखाद्य आणि पाणी टँकर वाटप करण्यात आले. उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना मिळालेल्या कर्जमाफीचीही चौकशी करणार आहेत.

बीडच्या जाहीर सभेत नेमके काय बोले

या सभेत ठाकरेंनी कर्जमाफी, शेतकरी, राम मंदिर, राफेल आदी मुद्यांवरून मोदींवर टीका केली आहे. “मी पुन्हा मराठवाड्यात येणार आहे, ही माझी शेवटची भेट नाही. ‘संधीसाधू येती घरा, समजा निवडणुका आल्या’ राफेल सारखाच पिक विमा योजना सुध्दा घोटाळा आहे. घोषणांमुळे जनतेचं पोट भरणार नाही. खोटे बोलून अन्नदात्‍याची फसवणूक करून नका. ना तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकला ना तुम्ही राम मंदिराचा मुद्दा सोडवू शकला, आम्ही मन की नाही तर जनची बातमी करतो. केंद्रीय पथक येऊन गेले, तुमच्या हातात काही मदत पडली का ? “असा सवाल ठाकरे यांनी जनतेला केला.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर राज ठाकरेंची घेणार भेट

Aprna

योगी आदित्यनाथ आज पालघरमध्ये

News Desk

#LokSabhaElections2019 : शत्रुघ्न सिन्हा लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार ?

News Desk