HW News Marathi
राजकारण

हिजड्याचे लग्न झाले तर त्याला मुले होतील, पण सिंचन योजना पूर्ण होणार नाही !

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कर्जबुडव्या विजय मल्ल्याची बाजू घेऊन सारवासारव केली होती. आता पुन्हा एकदा आणखी एक वादग्रस्त विधानामुळे चर्चेचा विषय ठरले आहेत. ‘एकवेळ हिजड्याचे लग्न झाले तर त्याला मुले होतील. मात्र सिंचन योजना पूर्ण होणार नाही, असे आम्हाला वाटलेहोते. मात्र भाजप सरकारने सिंचन योजना पूर्ण करुन दाखवली,’ असे गडकरी म्हणाले. गडकरी यांनी आज (२३ डिसेंबर) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ वरील सांगली-सोलापूर मार्गाचे चौपदरीकरण व राष्ट्रीय महामार्गच्या दुरुस्ती कामांचे कोनशिला अनावरण आणि सिंचन योजनांच्या मुख्य कामांच्या पूर्णत्वाचा वचनपूर्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना गडकरी यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे.

शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना सिंचनावर बोलत असताना गडकरींची जीभ पुन्हा घसरली. टेंभू सिंचन योजनेविषयी बोलताना गडकरींनी वादग्रस्त विधान केले. ‘टेंभू योजना अनेक वर्षांपासून अर्धवट होती. ही योजना कधी पूर्ण होईल, असे आम्हालादेखील वाटले नव्हते. खरंतर हे इथे बोलू नये. पण बोलतो. एकवेळ हिजड्याचे लग्न झाले तर त्याला मुले होतील. पण सिंचन योजना पूर्ण होणार नाही. मात्र भाजपसरकारच्या काळात ही योजना पूर्ण झाली. शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण झाले. टेंभूसारख्या अनेक महत्त्वाच्या आणि महत्त्वाकांक्षी योजना भाजप सरकारच्या कार्यकाळात पूर्णत्वास गेल्या,’ असे गडकरी म्हणाले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबई युथ कॉंग्रेसने केले मोदींना लक्ष

News Desk

नक्षली डोक्यांमध्ये ‘जिहादी हवा’ भरण्याचे उद्योग सुरू, आता डोके ठेचावेच लागेल !

News Desk

आता राज्याच्या आरोग्य खात्याचा अधिभार एकनाथ शिंदेंकडे 

News Desk
राजकारण

गुजरातमध्ये भाजप तर झारखंडमधील पोटनिवडणुकीत काँग्रेस विजयी

News Desk

नवी दिल्ली | गुजरातमधील जसदण विधानसभा जागेसाठी झालेल्‍या पोटनिवडणुकी आज (२३ डिसेंबर) भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे तर, झारखंडमधील कोलेबिरा जागेवर काँग्रेसने विजय मिळविला आहे. गुजरातमध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले कुंवरजी बावलिया १९९८५ मतांनी विजयी झाले आहे. तर बावलिया यांनी काँग्रेसचे निकटवर्ती अवसर नाकिया यांचा पराभव केला आहे. गुजरतमधील जसदन येथे एका जागेसाठी ८ उमेदवार रिंगणात होते. भाजपकडून कोळी समाजाचे नेते कुवरजी बावलिया रिंगणात होते. नाकिया यांना १९ हजार ९८५ मतांनी विजय मिळविला आहे.

 

झारखंडमध्ये काँग्रेसच्या नमन विक्सल कोंगाडी विजयी झाले आहेत. नमन यांना एकूण ४० हजार ३४३ मते मिळाली तर, भाजपच्या बसंत यांना ३०६८५ मते मिळाली. नमन यांनी भाजपच्या बसंत सोरंग यांचा ९६५८ मतांनी पराभव केला. या दोन्ही जागेंसाठी २० डिसेंबर रोजी मतदान झाले होते.

 

 

Related posts

अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाबाबत काहीही ठरलेले नव्हते !

News Desk

पुण्यात होणारी पोटनिवडणूक बिनविरोधी व्हावी; राज ठाकरेंचं फेसबुक पोस्टद्वारे आवाहन

Aprna

UP मध्ये मराठी भाषा शिकवा; भाजपच्या ‘या’ नेत्याने योगींना लिहिले पत्र

Aprna