HW News Marathi
राजकारण

त्यांच्या झेंड्याचा दांडाच आमच्या हातात आला आहे !

जालना | ‘झेंड्याचा दांडाच आमच्या हातात आला आहे, असे म्हणत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील यांनी विरोधकांवर टीका केली आहे. दानवे पुढे असे देखील म्हणाले की, राज्यातील विरोधी पक्षांचे १७ आमदार सध्या आमच्या पक्षात प्रवेशासाठी रांगेत उभे आहेत. येत्या ३१ तारखेला त्यातील चार जण भोकरदन येथे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा दानवे यांनी व्यक्त केला आहे. सध्या राज्यात पक्षांतरवर दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.

दानवे पुढे असे देखील म्हटले की, “झेंड्याचा दांडाच आमच्या हातात आला आहे. त्यांच्या जवळचे लोक भगव्या झेंड्याकडे आले आहेत. आम्ही खूप दिवसांपासून त्यांना भगव्याबद्दल सांगत होतो. पण ऐकत नव्हते. आता लोकांनीच भगवा कसा असतो ते दाखवून दिले,’ असे दानवे म्हणाले. ‘विरोधी पक्षाचे अनेक आमदार प्रवेशासाठी इच्छुक आहेत. पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह हे राष्ट्रवादीच्या सभेला उपस्थित नव्हते यावरून काय ते समजा,’ असेही दानवे म्हणाले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षांतर झाले करत आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी खुंटलेल्या विकासाचा मुद्दा पुढे करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर अनेक नेते भाजप प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे निवडणुकी आधीचे विरोधकांना मोठे धक्के बसले आहेत. परंतु पक्षाची ताकद वाढत आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ‘या’ काही ठरल्या लक्षवेधी

News Desk

कॉंग्रेसकडून भारत बंदचे आवाहन, मुंबईत ठिकठिकाणी होणार निदर्शने

News Desk

लोकसभेसाठी राष्ट्रवादीची जाहिरनामा समिती जाहीर

News Desk