HW News Marathi
राजकारण

उपेंद्र कुशवाहा यांचा एनडीएला रामराम तर यूपीएमध्ये प्रवेश

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमधून बिहारमधील प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय लोक समता पार्टीचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा एनडीएमधून बाहेर पडले आहेत. त्यामुळे भाजपच्या एनडीएला बिहारमध्ये मोठा तडा गेला आहे. कुशवाहा यांनी काँग्रेसप्रणित यूपीएशी हात मिळवणी केली आहे. कुशवाहा यांनी संदर्भात दिल्लीतील काँग्रेस कार्यलयात बैठक झाली. यानंतर कुशवाहा यांनी महाआघाडीत प्रवेश करत असल्याची घोषणा केली. त्यामुळे बिहारमधील भाजपाचा एक मित्रपक्ष कमी झाला आहे.

थोड्याच वेळापूर्वी दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात एक बैठक झाली. या बैठकीला उपेंद्र कुशवाहा यांच्यासह बिहार काँग्रेसचे प्रभारी शक्तीसिंह गोहिल, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, हिंदुस्तान अवाम मोर्चाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी उपस्थित होते. या बैठकीनंतर कुशवाहा यांनी आपण महाआघाडीत प्रवेश करत असल्याची घोषणा केली. ‘माझ्याकडे बरेच पर्याय होते. परंतु काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे मी यूपीएचा भाग होण्याचा निर्णय घेतला असल्याचे कुशवाहा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

कुशवाहा यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. राजदचे नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी कुशवाहा यांचे महाआघाडीत स्वागत करत मोदींवर निशाणा साधला. ही देश आणि संविधान वाचवण्याची लढाई असल्याचे ते म्हणाले. ‘सध्या देशात अघोषित आणीबाणी सुरू आहे. पंतप्रधान मोदींची हुकूमशाही करत आहेत. ज्यांनी जनतेचा फक्त आणि फक्त विश्वासघात केला, दिशाभूल केली, त्यांना जनता जोरदार प्रत्युत्तर देईल,’ अशी टीका यादव यांनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मायावतींचा जेडीएसला काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्याचा सल्ला

News Desk

अखेर नवाब मलिकांनी मागितली अण्णा हजारेंची माफी

News Desk

प्रभू रामचंद्रांची फसवणूक भाजपाला पडणार महागात

News Desk