HW News Marathi
राजकारण

विद्या चव्हाण यांनी विधानभवनाच्या प्रांगणात रावतेंना का आडविले

मुंबई | अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओला-उबर चालकांच्या विधानभवनावर धडक देणार होते. परंतु चालक त्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी करी रोडच्या भारतमाता चौकापासून ते विधानभवनापर्यंत मोर्च्या काढण्यासाठी मोठ्या संख्येने हजर झाले होते. राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावतेंना थांबवून ओला-उबर चालकांच्या प्रश्नाबाबत जाब विचारण्यासाठी थांबविले होते.

ओला-उबर चालकांनी सरकारला दिवाळीची डेडलाइन उलटून गेल्यानंतरी सरकारने त्यांच्या मान्या न झाल्यामुळे त्यांनी संप पुकारला आहे. यामुळे सर्वसामान्यांचे हाल सहन करावे लागत आहेत. विद्याताईंनी रावतें विधानभवनाच्या प्रांगणात थांबवून याबाबत प्रश्नांचा भिडीमार केला. त्यानंतर रावतेंनीही चिडून विद्याताईंना उत्तर दिले. प्रवासासाठी लोकल, बस, मेट्रोसह इतर पर्याय उपलब्ध आहेत. हा वाद न्यायालयात असून, माझ्या हातात काहीही नाही, असे म्हणत रावते तिथून निघून गेले. सरकारने ओला, उबर चालकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील ३० हजार ओला, उबर टॅक्सीचालक आणि मालक संघटना संपावर गेल्या आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कर्नाटकातील काँग्रेसचे संकटमोचक डी. के. शिवकुमार यांचे हॉटेलचे बुकिंग रद्द

News Desk

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा : सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

News Desk

चंद्रकांत पाटलांनी किशोर शिंदेंना दिली भाजपची ऑफर

Gauri Tilekar
राजकारण

निवडणुकांसाठी पुणे पोलीस भाजपला मदत करत आहेत !

News Desk

मुंबई | ‘पुणे पोलीस सरकारच्या इशाऱ्यावर चालणारे प्यादे बनले आहे’, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. पुणे पोलिसांकडून मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांचा भीमा-कोरेगाव दंगलीशी संबंध जोडून काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला मदत करण्यासाठी पुणे पोलीस प्रयत्नशील असल्याचा धक्कादायक आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने भीमा कोरेगाव दंगली संदर्भात न्यायालयात सुनावणी असताना देखील पुणे पोलीस सातत्याने माध्यमांसमोर का जात आहेत ? असा प्रश्न उपस्थित करत पुणे पोलिसांना खडे बोल सुनावले होते. परंतु त्यानंतरही पुणे पोलिसांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधणे थांबविले नाही. त्यामुळे पुणे पोलिसांबद्दलची विश्वासार्हता संपूर्णपणे नाहीशी झाली आहे, असे सचिन सावंत म्हणाले आहेत.

सरकार महाराष्ट्र पोलीस यंत्रणा गुजरात मॉडेलनुसार चालवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु गुजरात मॉडेलची कशी वाताहत झाली तशी महाराष्ट्र पोलिसांची अवस्था होऊ नये अशी चिंता सावंत यांनी व्यक्त केली. शहरी नक्षलवाद हा शब्द केवळ राजकीय फायद्यासाठी वापरून कट्टरतावाद्यांपासून लोकांचे लक्ष भरकटविण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.

Related posts

गेल्या ५ वर्षांत मोदींनी देशाची वाट लावली, पुढेही तेच करतील !

News Desk

शिवसेनेच्या ५६ विजयी आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक

News Desk

…और घमण्ड में हस्तियां अक्सर डूब जाती हैं !

News Desk