HW News Marathi
राजकारण

पर्रीकरांचे जळूप्रमाणे खुर्चीला चिकटून राहणे ही कोणती नैतिकता !

पणजी | काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयपाल रेड्डी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर बोचरी टीका केली आहे. मनोहर पर्रीकर यांचे जळूप्रमाणे खुर्चीला चिकटून राहणे कोणत्या नैतिकतेला धरून आहे, अशी टीका जयपाल रेड्डी यांनी केली आहे. “मनोहर पर्रीकर वारंवार नैतिकतेबाबत बोलतात. परंतु, पर्रीकर यांचे जळूप्रमाणे खुर्चीला चिटकून राहणे ही कोणती नैतिकता आहे ?”, असा सवाल जयपाल रेड्डी यांनी केला आहे. गुरुवारी मडगाव येथे पार्टीच्या ‘जन आक्रोश’ रॅली कार्यक्रमात संबोधित करताना त्यांनी हे विधान केलेले आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर प्रकृतीच्या कारणास्तव राजकारणात फारसे सक्रिय नाहीत. त्यामुळे गोव्यातील भाजपचा एक गट आणि सत्ताधारी आघाडीकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या व्यक्तींची नियुक्ती व्हावी अशी मागणी वारंवार होत आहे. काही दिवसांपूर्वी या मुख्यमंत्रीपदासाठी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे नाव सुचविले जात होते. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतीच्या समस्येमुळे त्यांना राज्यासाठी पुरेसा वेळ देणे शक्य होत नसल्याने हा पर्याय सुचविला जात आहे, असे म्हटले जात होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सलग तीन दिवस राज्यातील सत्तांतरावर युक्तीवाद पूर्ण; सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला निकाल

Aprna

#Results2018 : वसुंधरा राजे जिंकल्या, भाजप हारले

News Desk

महाराष्ट्राच्या धमन्यांमधील रक्त उसळणार आहे काय?

News Desk