HW News Marathi
राजकारण

“48 तासात प्रकरण पूर्ण संपले नाही तर…”, शरद पवारांचा इशारा

मुंबई | “आज जे काही झाले, उद्याच्या 24 तासात किंवा 48 तासात पूर्ण संपले नाही. तर माझ्यासह सगळ्याना बेळगावच्या लोकांना धीर देण्यासाठी जावे लागेल”, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी बेळगावच्या हिरेबागेवाडी टोल नाक्यावर गाड्यांची तोडफोडसंदर्भात दिला आहे. पुण्याहून बंगळुरूकडे जाणाऱ्या वाहनांवर कन्नड रक्षण वेदिके (Kannada Rakshana Vedike )या संघटनेने आज (6 डिसेंबर) दगडफेक करत त्यांची तोडफोड केला आहे. या पार्श्वभूमीवर शद पवारांनी पत्रकार परिषदेतून कर्नाटक सरकार आणि राज्य सरकारवर निशाणा साधला.

 

शरद पवार म्हणाले, “महाराष्ट्र एककीकरण समिती यांच्या लोकांच्या होणाऱ्या यातना. या सर्व गोष्टीत राज्य सरकार काय करतय हे बघून चालणार नाही. आज जे काही झाले, उद्याच्या 24 तासात किंवा 48 तासात पूर्ण संपले नाही. तर माझ्यासह सगळ्याना बेळगावच्या लोकांना धीर देण्यासाठी जावे लागेल.” कर्नाटक सरकारकडून कोणीही आमच्याकडे येऊ नये, चर्चा करून असे सांगितले जाते. आणि राज्य सरकार भूमिका का घेत नाही, केंद्र सरकारचा दवाब आहे का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारल्यावर ते म्हणाले, “केंद्राचा दबाव काय दोन्ही राज्यात त्यांची सरकार आहे. प्रश्न तो नाही. पण, आपण आजूनही संयम दाखवित होतो. जर हे असेच चालू राहिले. तर काय होईल हे काही सांगता येणार नाही.

 

देशाच्या ऐक्याच्या दृष्टीने घातक

 

सहा महिन्यानंतर कर्नाटकात निवडणुका आहे. एकतरीकर्नाटकचे मुख्यमंत्री वादग्रस्त विधान करून गाणित जमवण्याचा प्रयत्न करत आहे का?, असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवारांना विचारल्यावर ते म्हणाले, “कर्नाटक सरकारकडून सातत्याने जी काही भूमिका मांडली जाते. यापूर्वीचे मुख्यमंत्री अशी भूमिका कधी घेत नव्हते. आताच्या मुख्यमंत्र्यांनी ती घेतली. तिकडे निवडणुका आहे हे काय मला माहिती नाही. परंतु, माणसा माणसामध्ये भाषिका भाषिकांमध्ये कटूता वाढने हे देशाच्या ऐक्याच्या दृष्टीने घातक आहे. आणि स्वत: राजकीय स्वार्थासाठी तुम्ही असे काही करत असाल. तर ते निषेधार्थ आहे.

 

बेळगावसंदर्भात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी बोलण्यास सुरुवात केली

 

गेल्या अनेक वर्षापासून हा वाद सुरू आहे. परंतु, हा वाद आताच का वर येत आहे, असा सवाल पत्रकारांनी शरद पवारांना केल्यावर ते म्हणाले, “हे मला माहिती नाही”. राज्य सरकारच्या बैठकीनंतर राज्यातील वेगवेळ्या सीमाभागातून मागण्या होऊ लागल्या की आम्हाला इतर राज्यात जायाचे आहे, हे एक षडयंत्र आहे का?, असा प्रश्नावर शरद पवार म्हणाले, “राज्य सरकारने बैठक घेतली म्हणून नाही. सुरुवात कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी केली. पहिले, दुसरे, तिसरे स्टेटमेंट हे त्यांचे होते. त्यांच्या स्टेटमेंटला काही ना काही प्रतिक्रिया काही घटनाकांनी दिली असेल. तर त्यांचा तो दोष नाही. पण, यांची सुरुवात ही कर्नाटकातून केली. आणि हे करत असताना आतातपर्यंत कधी बेळगावाची चर्चा होती. आता एकदम एक, दोन, तीन ठिकाणची चर्चा जाणूवपूर्व झाली. आणि या प्रश्नाला स्वरुप द्याचा प्रयत्न करतो, ही गोष्ट आमच्या लक्षात आली.”

 

संबंधित बातम्या

बेळगावमध्ये महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड; उपमुख्यमंत्र्याचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फोन

महाराष्ट्रातील गाड्यांवर कर्नाटकच्या ‘या’ संघटनांकडून तोडफोड; सीमावाद चिघळण्याची शक्यता

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#मीटू मोहिमेला रामदास आठवलेंचा पाठिंबा

swarit

पुण्यात गणपती विसर्जनादरम्यान आदित्य ठाकरे-चंद्रकांत पाटील यांच्यात गप्पा; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Aprna

…तर मराठा आंदोलन भडकले नसते

News Desk