HW News Marathi
राजकारण

मनसेचा महाआघाडीत समावेश होणार ?

मुंबई | काँग्रेस पक्ष आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला शह देण्यासाठी महाआघाडीचे स्वप्न पाहत आहे. या महाआघाडीच्या अनुषंगाने काँग्रेसच्या राजकीय हालचालींना देखील वेग आला आहे. या भाजपविरोधी महाआघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देखील सोबत घ्यावे असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसपुढे मांडला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या या प्रस्तावास मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी विरोध दर्शविला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुख्य अजेंडा हा कायमच उत्तर भारतीयांविरोधी राहिलेला आहे. त्यामुळे मनसेला महाआघाडीत घेतल्यास काँग्रेस पेक्षाचे उत्तर भारतीय मतदार मोठ्या प्रमाणात दुरावण्याची शक्यता असल्याचेही म्हटले जात आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षांनी राष्ट्रवादीच्या या प्रस्तावाला काँग्रेसचा विरोध असून मनसे महाआघाडीचा भाग नसेल असे स्पष्ट केले आहे. परंतु अद्याप काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून अशी कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

मोदी सरकारच्या काळात वाढलेल्या महागाईविरोधात काँग्रेसने ‘भारत बंद’ची हाक दिली होती. या बंदला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा देत आपला सक्रिय सहभागही नोंदवला होता. तसेच काँग्रेसच्या नेत्यांकडून स्वाभिमानी शेतकरी संघटना, भारिप बहुजन महासंघ, लोकभारती या पक्षांच्या नेत्यांसोबत देखील चर्चा करण्यात आली होती. अशाच एका बैठकीत आघाडीच्या नेत्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही महाआघाडीत सोबत घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र काँग्रेसने या प्रस्तावास विरोध केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मोदींचा शपथविधी सोहळा देशाला मजबुतीकडे नेणारा ठरेल ही ईश्वरी योजनाच !

News Desk

भाजप सरकारच्या काळात महागाईवर नियंत्रण ठेवण्यात यश आले ! 

News Desk

कर्नाटक विधानसभा निवडणूकीत भाजपला झटका बसण्याची शक्यता

News Desk
महाराष्ट्र

आजपासून १२ वीचे ऑनलाईन फॉर्म

News Desk

मुंबई | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचे अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात होणार आहे. सरल प्रणालीच्या माध्यमातून अर्ज भरण्याची सूचना मंडळाने केली आहे. मंडळाने अद्यापही परीक्षेचे वेळापत्रकही जाहीर केलेले नाही.

अर्ज भरण्यासाठी २१ ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे. त्यानंतर विलंबित शुल्कासह ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येतील. सरल प्रणालीमध्ये नोंद असणाऱ्या विद्यार्थ्यांचेच अर्ज वैध ठरणार असल्याने अकरावीमधील अनियमित प्रवेश समोर येणार आहेत.

mahahsscboard.maharashtra.gov.in किंवा www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर अर्ज भरायचे आहेत. परीक्षेचे वेळापत्रक मात्र जाहीर केलेले नाही.

Related posts

राज साहेबांसोबत कोणताही अनुचित प्रकार घडला तर…!

News Desk

बेजबाबदार नागरिकांमुळे शहरातील समस्या वाढल्या

News Desk

देशाचा पंतप्रधान कोण, मोदी की शहा ?

News Desk