HW News Marathi
राजकारण

ऍट्रॉसिटी कायद्यासंदर्भात  9 ऑगस्टचे भारत बंद आंदोलन मागे घ्या | रामदास आठवले 

मुंबई | ऍट्रॉसिटी कायदा शिथिल करणारा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करणारे आणि ऍट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण करणारे विधेयक केंद्रसरकारने तयार केले असून त्या विधेयकास केंद्रियमंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे. संसदेच्या चालू अधिवेशनात हे विधेयक मंजूर करण्यात येणार आहे.त्यामुळे या मागणीसाठी पुकारलेले 9 ऑगस्ट चे भारत बंद चे आंदोलन आता करण्याची आवश्यकता नसल्याने हे आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देशभरातील आंबेडकरी जनतेला केले आहे.

ऍट्रॉसीटी कायद्याच्या संरक्षणासाठी नवे विधेयक संसदेच्या चालू अधिवेशनात मंजूर करण्यात येणार आहे. पदोन्नतीमध्ये अनुसूचित जाती जमातींना आरक्षण लागू करणारा कायदा संसदेत मंजूर करण्यात येणार आहे. त्यामुळे अनुसूचित जाती जमातीच्या महत्वाच्या मागण्यांवर केंद्रसरकार ने समाधानकारक मार्ग काढला असल्याने या मागण्यांसाठी पुकारलेला दि 9 ऑगस्ट चा भारत बंद करण्याची आवश्यकता नाही. अनुसूचित जाती जमाती अल्पसंख्यांकांसह बहुजनांच्या न्यायहक्कांच्या प्रश्नांसाठी आम्ही संसदेत आणि केंद्रसरकार मध्ये खंबीर असल्याचे प्रतिपादन रामदास आठवले यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस

News Desk

सुरक्षेसाठी काँग्रेसकडून कृती दलाची स्थापना, सर्जिकल स्‍ट्राईकचा ‘हिरो’ करणार नेतृत्त्व

News Desk

भाजपने साध्वी प्रज्ञा यांची पक्षातून हकालपट्टी करून राजधर्म निभवावा !

News Desk