HW News Marathi
क्रीडा

मणिपूरमधील शेतकऱ्याच्या मुलाने पटकावले पहिले सुवर्णपदक

पुणे | पुण्यातील बालेवाडी क्रीडासंकुलात सुरू झालेल्या ५२ व्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत ७५ किलो वजनी गटात भारताकडून मणिपूरच्या दिनेश सिंगने चमक दाखवली असून आंध्र प्रदेशच्या एन. रवीकुमारने त्याच गटात कांस्यपदक पटकावले आहे. इम्फाळमधील एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा दिनेशने आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे. दिनेश सिंगला या विजेतेपदानंतर खूप आनंद झाला. त्याने त्याच्या विजयाचे श्रेय आपले मार्गदर्शक के. प्रदीपकुमार सिंग यांना दिले आहे. या गटात व्हिएतनामच्या ली गिआ हुए याने रौप्यपदक पटकावले आहे.

गेल्या वर्षी दक्षिण कोरियामध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये दिनेशला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे या स्पर्धेतील विजेतेपद पटकावल्यानंतर हे पदक संपूर्ण देशाला समर्पित करीत असल्याचे त्याने यावेळी सांगितले आहे. तर भारतासाठी ७५ किलोवरील गटातील निकाल निराशाजनक ठरला आहे. ठोकचोम ग्यानेंद्र आणि एल. हेनारी सरमा यांना अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.

इराणच्या हमीद अहमदीने ७५ किलोवरील गटात सुवर्ण, उझबेकिस्तानच्या व्लादिमीर वॅलिनकिनने रौप्य तर इराकच्या अहमद अली हुसेनने कांस्यपदक पटकावले आहे. ४० ते ४९ वयोगटातील मास्टर्स गटातसूद्धा भारताच्या हाती निराशा आली आहे . तर ५० ते ६० या मास्टर्स गटात भारताच्या संजय आंबेरकर यांना रौप्य तर एस. श्रीनिवासन यांना कांस्यपदक मिळाले आहे. तसेच या गटात चीनच्या क्यू गुइक्विअन याने सुवर्णपदक पटकावले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावेत – जिल्हाधिकारी नांदेड

News Desk

भारताने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवत १-०ने घेतली आघाडी

News Desk

टॉपलेस सेरेना विल्यम्स जेव्हा ब्रेस्ट कॅन्सर विषयी जनजागृती

swarit
महाराष्ट्र

राजू शेट्टी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक

Gauri Tilekar

मुंबई | देशातील आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये पूर्वतयारीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी देशातील सर्वच विरोधी पक्षांच्या राजकीय हालचालींना अत्यंत जलद गतीने सुरु आहेत. याचसंदर्भात आज (शनिवार) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक झाली आहे.

या बैठकीत भाजप सरकार विरोधी महाआघाडी उभी करण्याच्या संदर्भात या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. “भाजपाला पराभूत करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. तिसरी आघाडी करण्यापेक्षा २०१४ सालच्या गोपीनाथ मुंडे यांच्या महायुतीप्रमाणे एक व्यापक महाआघाडी करणे हिताचे ठरेल,” असे सूचक वक्तव्यही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “दोन्ही नेत्यांमध्ये आघाडीबाबत चर्चा झाली आहे. परंतु आमची वंचित बहुजन आघाडी असून काँग्रेसला या आघाडीत यायचे असेल तर त्यांनी विचार करावा.” त्याचप्रमाणे “तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या आघाडीबाबतचा निर्णय आम्ही अजून घेतला गेलेला नाही”, अशी माहिती देखील प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी दिली आहे. या बैठकीत आमदार कपिल पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर उपस्थित होते.

औरंगाबाद वंचित बहुजन आघाडीच्या महाअधिवेशनात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी एकत्र दिसले. ओवेसी-आंबेडकरांच्या मैत्रीमुळे निश्चितच महाराष्ट्रातील राजकारणाची समीकरणे बदलणार आहेत. आता यांच्यासोबत राजू शेट्टी देखील सामील होणार का याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

Related posts

आयपीजीए नॉलेज सीरीज यांच्यातर्फे खरीप पिकांची सद्यस्थिती या विषयावर वेबिनार आयोजित

News Desk

‘राजू शेट्टी बिनबुडाचा लोटा’ शेट्टी, म्हणतात, कुणाची भाटगिरी करताय?

News Desk

पारदर्शक मुख्यमंत्र्यांचा 18 हजार कोटींचा घोटाळा

News Desk