HW News Marathi
Uncategorized

शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया दोन ते तीन महिन्यात पूर्ण करणार !

नागपूर | शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया दोन ते तीन महिन्यात पूर्ण करणार, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी सांगितले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या अनौपचारिक गप्पामध्ये अजित पवार यांनी सांगितले. हिवाळी अधिवेशनाचा आजचा (२० डिसेंबर) पाचवा दिवस आहे. अजित पवार पुढे म्हणाले की, शेतकरी कर्जमाफी कशी द्यायची याबाबत मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांमधील कर्जमाफीचा अभ्यास सुरू आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विरोधकांनी सरकारविरोद्धात आक्रमक भूमिका घेतली होती. आणि महाविकासआघडीच्या सरकारविरोधात घोषणाबाजी दिल्या होत्या. शेतकर्यांना हेक्टरी २५ हजारांची मागणी विरोधकांनी केली. सरकारमध्ये वरिष्ठ पातळीवर शेतकरी कर्जमाफीबद्दल चर्चा सुरू आहे. त्यामुळे कर्जमाफी संदर्भता लवकरच निर्णय घेतला जाईल.

भाजपवाल्यांनी केंद्रात जाऊन शिमगा करावा | मुख्यमंत्री

शेतकऱ्यांच्या नावाने राज्याच्या विधानसभेत गोंधळ घालणाऱ्यांचेच सरकार केंद्रात आहे. त्यांच्याकडे राज्याने यापूर्वीच मदतीची मागणी केली आहे. मात्र, एकही पैसा आलेला नाही. त्यामुळे भाजपवाल्यांनी इथे आदळआपट करण्यापेक्षा केंद्रात जाऊन शिमगा करावा,’ असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. विरोधकांच्या गदारोळानंतर हिवाळी अधिवेशनाच्या मंगळवारी (१७ डिसेंबर) कामकाज तहकूब झाल्यावर माध्यमांशी बोलताना म्हणाले.

 

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी देवेंद्र फडणवीसांना विचारले मग कसे काय पाऊसपाणी ?

News Desk

Padalkar यांनी देखील घेतली Wankhede यांची बाजू! म्हणाले “गांजा वाल्यांचे प्रवक्ते…”

swarit

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना मिळाला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा

News Desk