HW News Marathi
Uncategorized

हिंमत असेल तर अटक करून दाखवा ..आंबेडकांचे मोदींना आव्हान !

मुंबई | सुधारित नागरिकत्व कायदा अर्थात (सीएए) आणि एनआरसी माध्यमातून देशात अराजकता माजवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने केले आहे. सीएए हा आरएसएसचा डाव आहे, अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान आणि आरएसएसवर जोरदार टिका केली आहे.सीएए हा कायदा 100 टक्के मुस्लिम विरोधात आहे. त्याचसोबत 40 टक्के हिंदु विरोधी आहे, असे सांगत हिंमत असेल तर अटक करून दाखवा, असे थेट आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारला दिले आहे.

दादरच्या खोदादाद सर्कल येथे सीएए विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली नव्हती. या आंदोलनासाठी राज्यभरातून शेकडो कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले होते.

यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले, पंतप्रधान तुम्ही खोटारडे शिवाय काहीच नाही हे सिद्ध करत आहात. गृहमंत्री अमित शहा कायदा लागू करू, असे विधान पंतप्रधानांना न विचारता केले का? जर तसं केले असेल तर शहा यांचा राजीनामा घेणार की त्यांच्याकडून गृहखाते काढणार? असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#NirbhayaCase : सर्वोच्च न्यायालयाने आरोपी मुकेशची याचिका फेटाळली, फाशीचा मार्ग मोकळा

swarit

#Vidhansabha2019 | राज्यात युतीकडून रिपाईला ‘या’ ६ जागा

News Desk

बच्चू कडूंमुळे शिंदे गट आणि भाजपमध्ये संघर्ष पेटणार?

Manasi Devkar