HW News Marathi
Uncategorized

वाड्या-वस्त्यांच्या जातिवाचक नावांनी ग्रामीण भागात होणारी विषमता थांबणार का?

मुंबई | महाराष्ट्रात वेगवेळ्या गावांका किंवा रस्त्यांना दिग्गज नेत्यांची किंवा पुढाऱ्यांची नावे देण्याची शासनाची सवय आता मोडणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. राज्यातील खेडेगावांना ठेवण्यात आलेली जातिवाचक नावे बदलण्याच्या तयारीत ठाकरे सरकार आहे. दरम्यान, या बाबतीतील ठोस निर्णय लवरकात लवकर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार अस्याची शक्यता आहे. आज (१२ फेब्रुवारी) दुपारी दोन वाजता मंत्रालयात होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत सामाजिक न्याय विभाग यासंबंधी प्रस्ताव मांडणार असल्याची माहिती आहे. तसेच या वाड्या-वस्त्यांना शाहूनगर, समतानगर, ज्योतीनगर, प्रगतीनगर, विकासनगर अशी नावे ठेवण्याचा विचार आहे.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी वस्त्यांची नावे बदलणार असल्याचे संकेतही दिले होते. काळानुसार काही निर्णय घेण्याची गरज असते. यापुढे महाराष्ट्रात कुठेही जातीच्या नावाने वस्ती असायला नको, असे आदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्याचे मुंडेंनी यावेळी सांगितले होते. कॅबिनेट बैठकीत याबाबत निर्णय होईल. राज्यात जातीवर आधारित असलेल्या वस्तींची नावे बदलण्याचे काम पूर्ण होईल. आणि मह्त्त्वाची बाब म्हणजे समाजातील वंचित घटकाला न्याय देण्यासाठी अनेक बदल करण्याची गरज असल्याचेही मुंडे यांनी सांगितले.

राज्यातील वाड्यांना किंवा वस्त्यांना अशी जातिवाचक नावे दिल्याने ग्रामीण भागात भेदाभेद आणि विषमता पसरते. मात्र समाजातील सर्व घटकांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी ही अशी प्रकारची काही ठोस पावले उचलण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जाड पुरुषांची सेक्स लाईफ इतरांपेक्षा का वेगळी असते?

News Desk

राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ५००च्या जवळ, चिंता वाढली

News Desk

संभाजीराजे छत्रपतींना भाजपनं संधी नाकारली? राज्यसभेत संजय राऊत भिडले!

News Desk