HW News Marathi
Uncategorized

जागतिक अवयवदान विशेष : औरंगाबादेत २० महिन्यांत १२ जणांचे दान

औरंगाबाद : जिल्ह्यात गेल्या २० महिन्यांत १२ जणांनी अवयवदान केले आणि यातून अनेकांना नवे आयुष्य मिळाले. १३ ऑगस्ट हा दिवस जागतिक अवयवदान दिन म्हणून पाळण्यात येतो. त्यानिमित्त हा विशेष आढावा. . .

अवयवदानासाठी पारंपरिक मृत्यूची व्याख्या बदलून ‘ब्रेन डेड’ ही व्याख्या कायद्याने संमत केली आहे. ब्रेन डेड व्यक्ती आणि अवयवांची गरज असलेल्या रुग्णांमध्ये जीवरक्षक अवयवांची देवाण-घेवाण करण्यासाठी अधिकृत मध्यस्थ म्हणून विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती (झेडटीसीसी) काम करते. या समितीसह विविध संस्थांच्या माध्यमातून मराठवाड्यात अवयवदानाची चळवळ पुढे नेली जात आहे. एका ब्रेन डेड व्यक्तीचे हृदय, यकृत, किडनी, डोळे या अवयवांच्या दानामुळे किमान सहा व्यक्तींना नवीन आयुष्य मिळू शकते.

गेल्या काही महिन्यांत झालेल्या १२ जणांच्या अवयवदानात २४ किडन्या, ११ यकृत, ७ हृदयांचे गरजू रुग्णांना प्रत्यारोपण करण्यात आले. तसेच नेत्रदानही झाले. त्यामुळे अनेकांचे जीवनच बदलून गेले. अवयवदानासंदर्भात असलेले गैरसमज दूर करण्यासह अवयवदानात वाढ होण्यासाठी विविध स्तरांवरून प्रयत्न केले जात आहेत. त्यास ब-यापैकी यश मिळत असल्याचे दिसते. ‘२०१६ मध्ये ९ जणांचे अवयवदान झाले. यावर्षी आतापर्यंत ३ अवयवदाने झाली आहेत. अवयवदानाची चळवळ वाढली पाहिजे, असे मत डॉ. सुधीर कुलकर्णी (अध्यक्ष, झेडटीसीसी) यांनी व्यक्त केले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जालना येथे सैन्य भरती

News Desk

शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, औरंगाबादमध्ये इम्तियाज जलील यांची ‘आघाडी’

News Desk

गांधींच्या हत्येचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांचा विजय ही देशासाठी चिंतेची बाब !

News Desk