HW News Marathi
महाराष्ट्र रिपोर्ट कार्ड

महाराष्ट्रात ‘सावरकर वाद’ ओढावून राहुल गांधींनी काय साधलं?

मुंबई | काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या भारत जोडो यात्रेचा आज (20 नोव्हेंबर) महाराष्ट्रातला शेवटचा दिवस. 14 दिवसांसाठी ही यात्रा महाराष्ट्रात दाखल झालेली. महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांत प्रवास करून आता ही यात्रा पुढे निघाली आहे. पण महाराष्ट्रातील ही यात्रा आणखी एका कारणामुळे ‘विशेष’ चर्चेत आली ती म्हणजे राहुल गांधींच्या विधानामुळे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी विधान करून राहुल गांधींनी नक्की काय साधलं याचाच आढावा आपण घेणार आहोत.

आज या यात्रेचा महाराष्ट्रातला अखेरचा दिवस असून आता ही यात्रा मध्य प्रदेशमध्ये निघाली आहे. पण महाराष्ट्रात या यात्रेने काय मिळवलं आणि काय गमावलं हे जाणून घेण्यासाठी आपण ‘राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या विधानाने काय मिळवलं’ यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. मग आपल्या लक्षात येईल की या यात्रेने महाराष्ट्रात काय मिळवलं. खरंतर महाराष्ट्रात सावरकरांवर विधान केलं तर वाद होईल याची कल्पना राहुल यांना नव्हती असं मुळीच नाही. सावरकरांवरून वाद निर्माण होणार हे संपूर्ण काँग्रेसला माहित होतं. परंतु राहुल गांधींना हेच हवं होतं असंच म्हणावं लागेल. असं का ते पुढच्या काही मुद्द्यांवरून तुमच्या लक्षात येईल.

“सावरकरांवर भाष्य करणं हा त्यांचा अजेंडा नव्हता”

खरंतर कुठलाही कार्यक्रम हा पूर्वनियोजित असतो, हे आपल्याला माहितच आहे. त्याचप्रमाणे राहुल गांधी आपल्या सभेत काय बोलणार? कोणते मुद्दे मांडणार हे देखील नियोजित होतं. विशेष म्हणजे या 14 दिवसांच्या यात्रेत सावरकरांवर भाष्य करणं हा काँग्रेसचा अजेंडा नव्हताच, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. पण असं असेल तर राहुल गांधींनी सावरकरांवर टीका करण्यामागे कारण काय असा प्रश्न निर्माण होतो. याचं कारण म्हणजे भारत जोडोला ‘चर्चेत’ आणणं.

सुरुवातीपासूनच भारत जोडोला हवं तसं महत्त्व मिळत नव्हतं. सर्वसामन्यांमध्ये या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असला तरी माध्यमांकडून तितकी दखल घेतली गेली नाही. त्यामुळे हवी तशी ही यात्रा चर्चेत नव्हती. याउलट ही भव्य यात्रा महाराष्ट्रात असूनही इतर मुद्दे चर्चेत आले, ज्यामुळे भारत जोडो ‘साईडलाईन’ झाली. सुरुवातीला 103 दिवसांपासून जेलमध्ये असलेल्या संजय राऊतांची सुटका झाली. मग हर हर महादेव या चित्रपटावरून झालेला वाद असो आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना झालेली अटक असो, मग आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल होणं, अफझलखानच्या कबरीचा वाद सुरू होणं, यामुळे भारत जोडोला हवं असणारं अटेन्शन इतर राजकीय मुद्द्यांना मिळत गेलं. यामध्ये भारत जोडोचा पहिला टप्पा असाच पार पडला.

दरम्यान, यानंतर शेवटच्या टप्प्यात असताना मात्र राहुल यांनी सावरकरांवर भाष्य केलं आणि भारत जोडो चर्चेत आली. माध्यमांपासून राजकीय वर्तुळात देखील प्रत्येकाने राहुल गांधी आणि भारत जोडोला महत्त्व दिलं, जे काँग्रेसला अपेक्षितच होतं. भारत जोडोला महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी एक रणनीती म्हणूनच राहुल गांधींनी सावरकरांवर टीका केली आणि भारत जोडो ‘चर्चेत’ आली!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छगन भुजबळांवर शिवसेनेची बॅनरमधून जहरी टीका

News Desk

‘फक्त रक्ताचं नातं म्हणून माझ्या 3 बहिणींच्या घरी आयकराचे छापे’- अजित पवार

News Desk

शरद पवारांबद्दल पण बोलणाऱ्यांची लायकी काय आहे?

News Desk