HW News Marathi
राजकारण

“एखादा माणूस ‘ज्या’ दिवशी नशिबालाच स्वतःचं कर्तुत्व समजू लागतो…”, उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर राज ठाकरेंची टीका

मुंबई | “एखादा माणूस ज्या दिवशी नशिबालाच स्वतःचं कर्तुत्व समजू लागतो त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो,” असे ट्वीट करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी काल (30 जून) मुख्यमंत्री आणि विधान परिषदेच्या सदस्तत्वायाच पदाचा राजीनामा आहे.

राज ठाकरेंनी ट्वीटमध्ये म्हणाले, “एखादा माणूस ज्या दिवशी नशिबालाच स्वतःचं कर्तुत्व समजू लागतो त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो.” “मी आपल्या सगळ्यांसमोर मुख्यमंत्री पदाचा त्याग करत आहे,” असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी काल रात्री फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधता त्यांनी राजीनामा दिला आहे.

मुख्यमंत्री पदाचा राजीनामा उद्धव ठाकरे नेमके काय म्हणाले

“मी आपल्या सगळ्यांसमोर मुख्यमंत्री पदाचा त्याग करत आहे. आपण सगळ्यांनी मला आजपर्यंत खूप प्रेम दिले आहे. मला आशीर्वाद दिले. मी घाबरणार नाही, कारण उद्या बंदोबस्तात शिवसैनिकांचे रक्त सांडेल. त्या पापाचे धनी मला व्हायचेय नाही. आणि मी ते होऊ देणार नाही. मी शिवसैनिकांनाही सांगेन की उद्या अजिबात त्यांच्या मध्ये येऊ नका. त्यांचा आनंद त्यांना लुटू द्या. त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्रीपदावरून खाली उतरवले. याचे त्यांना खाऊ द्या. ज्यांना वाटायचे त्यांना वाटू द्या. तो गोडवा त्यांना लखलाभ. मला तुमच्या प्रेमाचा, आशीर्वादाचा गोडवा पाहिजे. हा कुणी हिरावून नाही घेऊ शकत.”

संबंधित बातम्या
मी आपल्या सगळ्यांसमोर मुख्यमंत्री पदाचा त्याग करतोय! – उद्धव ठाकरे

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतीय क्रिकेट टीमचे दिग्गज फलंदाज निवडणुकीच्या पिचवर

swarit

वर्षा गायकवाड यांचा पूरग्रस्त भागात दौरा, कार्यकर्त्यांनी वाजवले फटाके

News Desk

लोकशाहीच्या नावाने असे करणे बरे नाही !

News Desk