HW News Marathi
व्हिडीओ

‘देशाचं नेतृत्व ठाकरे करतील,राणेंनी केंद्रातुन 2 हजार कोटींचा चेक घेऊन यावा’

राज्यात आलेलं पूराचं संकट आणि त्यावरुन सुरु असलेलं राजकीय नेत्यांचं भांडण. यावर शिवसेननेचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. आज (२७ जुलै) पत्रकारांशी बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील केंद्रामधील नेत्यांवर निशाणा साधला आहे. आपल्या राज्यातील जनतेला मदत आणि सहाय्य करण्यासाठी महाराष्ट्र सरकार सक्षम आहे. मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिले आहेत. पण केंद्राची म्हणून काही जबाबदारी आहे. महाराष्ट्र केंद्राला सर्वाधिक कर देतं. विशेषत मुंबई. पण आम्ही तो हिशोब मागायला बसलो नाही. केंद्र आमचा बाप आहे. त्यांच्याकडून मदत झाली तर ती नक्कीच स्विकारली जाईल, असं सांगतानाच केंद्रात महाराष्ट्रातील अनेक मंत्री आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सहीचा दोन हजार कोटींचा चेक घेऊन यावं. आम्ही त्याचं वाजत गाजत स्वागत करू, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला.

#SanjayRaut #NarayanRane #narendramodi #bjp #shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जगदंबा तलवार परत आणण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस-भाजप आमनेसामने

News Desk

Karuna Sharma प्रकरणात Dhananjay Munde यांच्या राजीनामाच्या मागणीने Dalit समाजाने धरला जोर

News Desk

दिल्लीच्या कर्तव्यपथावर झळकणार ‘साडे तीन शक्तीपीठ’चा देखावा

Manasi Devkar