HW News Marathi
महाराष्ट्र

तुमच्याकडे लायक उमेदवार नाहीत का ? रोहित पवारांची भाजप-सेनेवर टीका

अहमदनगर | राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने काल (२५ जुलै) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. इच्छुक उमेदवारांत कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून रोहित पवार यांनी मुलाखत दिली. मुलाखतीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना रोहित म्हणाले की, “पक्ष का सोडून जातात, हा प्रत्येकाचा व्यक्तीचा वैयक्तिक कारण आहे. आणि काही तरी वैयक्तिक अडचण असल्याशिवाय ते असा निर्णय घेणार नाहीत. काहीजण इतर पक्षात गेले तरी राष्ट्रवादीला काही फरक पडणार नाही.”

तसेच रोहित पुढे असे देखील म्हणाले की, “”भाजप-शिवसेना खुनशी राजकारण करीत आहे. ते समाजासाठी चुकीचे आहे. लोकांचे विषय घेऊन राजकारण केले पाहिजे. सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन राजकारण व्हावे, नेत्यांच्या भांडणात मुलभूत प्रश्न मागे राहतील, हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे,” असे म्हणाले. दुसऱ्या पक्षातील नेते फोडून स्वतःच्या पक्षात आयात करून त्यांना उमेदवारी देण्याची वेळ भाजप व शिवसेनेवरआली आहे. भाजप आणि शिवसेनेकडे स्वत:चे लायक उमेदवार नाहीत का, असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला आहे .

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात प्रत्येक कारवाई ‘ही’ कायद्याने होणार!, राणा दाम्पत्यांना न्यायालयीन कोठडीनंतर राऊतांची प्रतिक्रिया

Aprna

महाजाॅब्स ही योजना महाविकास आघाडी सरकारची आहे, की शिवसेना-राष्ट्रवादीची? – सत्यजित तांबे यांचा आघाडीला सवाल

News Desk

‘जयंत पाटलांच्या बीड दौऱ्यावर गोपीचंद पडळकरांची टीका, म्हणाले “आधी चंद्रावर…”!

News Desk