HW News Marathi
राजकारण

जितेंद्र आव्हाडचे प्रकाश आंबेडकर यांना उत्त्तर

मुंबई | मिलिंद एकबोटेंना पाठिशी घातल्यासंदर्भात प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांवर केलेल्या गंभीर आरोपांवर राष्ट्रवादीकडून तात्काळ प्रत्युत्तर देण्यात आले आहे. प्रकाश आंबेडकरांनी कोणासोबत जावे, हा त्यांचा प्रश्न आहे, पण त्यांनी विनाकारण आमची बदनामी करू नये, नाहीतर आम्हीही त्याच भाषेत प्रत्युत्तर देऊ, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिक यांनी दिलाय.

आघाडीच्या काळात गृहविभागाने मिलिंद एकबोटे यांची संघटना आणि सिमी यांच्याविरोधात बंदी आणण्याचा प्रस्ताव दिला होता. पण शरद पवारांनीच त्यांना त्यावेळी पाठिशी घातले होते. त्यामुळे शरद पवारांनी आपल्याला तोंड उघडायला भाग पाडू नये, असा गर्भित इशारा प्रकाश आंबेडकरांनी दिला होता. त्यावर राष्ट्रवादी विरूद्ध प्रकाश आंबेडकर असा सामना रंगण्याची चिन्हं दिसत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

माहुलमधील प्रकल्पग्रस्तांचे “जीवन बचाओ आंदोलन”

News Desk

काँग्रेस नेता ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला उधाण

News Desk

एकनाथ शिंदेंनी आमदारांचे भावनिक पत्र केले ट्वीट

Aprna
राजकारण

पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा 73 वा वर्धापन दिन साजरा

News Desk

मुंबई | संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनाअपेक्षित सामाजिक समतेची क्रांती घडविण्याचा मार्ग शैक्षणिक क्रांतीतूनच होईल. त्यासाठी समाजात शिक्षणाचा प्रसार केला पाहिजे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी उच्च शिक्षण घेऊन नोकरी केली नाही तर समाजाच्या उद्धारासाठी स्वतःला वाहून घेतले. जगातील सर्वश्रेष्ठ विद्वान महामानव डॉ. बाबसाहेब आंबेडकर असल्याचा आम्हाला अभिमान असून त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केल्याने ही संस्था सामाजात झालेल्या शैक्षणिक प्रगतीचा ऐतिहासिक पाया ठरली आहे. असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

पीपल्स एज्युकेशन संस्थेच्या 73 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालयाच्या बुद्धभवन येथील सभागृहात आयोजित कर्यक्रमात रामदास आठवले अध्यक्ष म्हणून बोलत होते. रामदास आठवले हे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे चेयरमन आहेत. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयात अनेक विद्यार्थी घडले त्यात समाजसेवक, पत्रकार, डॉक्टर , क्रिकेटपटूही घडले. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या ऐतिहासिक पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयात रामदास आठवले हे सुद्धा विद्यार्थी होते. आज ते केंद्रियराज्यमंत्री पदापर्यंत पोहोचले असून पीपल्स एज्युकेशन सोसायटी या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष असल्याबद्दल आम्हाला अभिमान असल्याचे यावेळी रिपाइं पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांनी आपले मत व्यक्त केले.

यावेळी पी ए सोसायटीचे अशोक तळवटकर, सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य जी. व्ही.राव, डॉ. जयमंगल धनराज, गौतम सोनवणे, बी के बर्वे, एड आशाताई लांडगे, चंद्रशेखर कांबळे, घनश्याम चिरणकर, सो ना कांबळे, प्रकाश कमलाकर जाधव , सचिन बनसोडे, सचिनभाई मोहिते, शिरीष चिखलकर, आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

Related posts

“आयुष्यातून उठविण्याचे काम युवा सेना प्रमुखांनी केले”, राहुल शेवाळेंचा आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप

Aprna

अण्णांच्या गर्जनांचा पचपचीत गाजर हलवा झाला | उद्धव ठाकरे

News Desk

छगन भुजबळ यांना आपले मतदान केंद्रच सापडेना

News Desk