HW News Marathi
महाराष्ट्र

नवाब मलिकांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा – जयकुमार रावल

धुळे | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकला असल्याची माहिती पर्यटनमंत्री आणि पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिलीआहे. ‘एखादा प्रकल्प जाहीर झाला की, शेतकऱ्यांकडून कवडीमोलाने जमीन विकत घेतात. ज्या ठिकाणी प्रकल्प येतात त्या ठिकाणी जमीन खरेदी करुन वाढीम मोबदला घेण्याचा प्रकार रावल करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. ’ धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन रावल यांच्यावर हे आरोप केले.

धुळ्याचे शेतकरी धर्म पाटील यांच्या अंत्यसंस्कार झाल्यानंतर माध्यमाशी बोलताना पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले की, नवाब मलिकांविरोधात दोंडाईच्या कोर्टात अब्रू नुकसानीदा दावा ठोकला आहे. ‘माझ्या आजोबांनी ही विविध प्रकल्पासाठी जमीन दिल्या आहेत.’असे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी म्हटले.

सरकारारी अधिकाऱ्यांना निराश होऊन धर्मा पाटील यांनी आत्महत्या केली. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला असून पाटील यांना महेंद्र आणि नरेंद्र अशी दोन्ही मुले आहेत. पाटील यांच्या अंत्यसंस्कारा वेळी धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल देखील उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

बाप्पासाठी मिठाई घेताय; जरा जपून!

News Desk

आठवलेंच्या पक्षाचा एकही आमदार व खासदार नाही, शरद पवारांनी घेतला आठवलेंचा समाचार

News Desk

“कोव्हिड काळात मुख्यमंत्र्यांकडून योग्य पद्धतीने नियोजन!”, एकनाथ शिंदेंचं सीटी रवींना प्रत्युत्तर

News Desk
देश / विदेश

राजस्थानमधील अजमेर, अलवर आणि माडंलगड येथे फेरनिवडणुका

swarit

राजस्थान | अजमेर आणि अलवर या दोन लोकसभेच्या जागेसाठी तर दुसरीकडे माडंलगड येथे विधानसभेच्या जागेसाठी सोमवारी फेरनिवडणुका घेण्यात आली. या मतदान केंद्रा बाहेर मोठ्या संख्येने नागरिकांनी घरातून बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावला. तर काँग्रेस आणि भाजपने या ठिकाणी दोन्ही पक्षाच्या वतीने आपली सत्ता येईल असा दावा करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार माडंलगड या विधानसभा क्षेत्रात ६२ टक्के मतदान झाले असून अजमेर आणि अलवर या लोकसभेच्या जागेसाठी ६० ते ६५ टक्के इतके मतदान झाल्याचे सांगितले जाते. काही मतदान केंद्रांमध्ये वोटिंग मशिनमध्ये गडबड झाल्यामुळे थोड्या वेळेसाठी मतदानावर परिणाम झाला होता. पण, सायंकाळी ७ वाजेपर्यंत या ठिकाणी मतदान सुरू असून निवडणूक आयोगाने मतदान केंद्रात कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहाराची माहिती दिली नाही.

कैबिनेट मंत्री वासुदेव देवानानी यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्का बुकी झाल्याची घटनासमोर आली आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रात घूसण्याचा प्रयत्न केला असून आचार संहितेचे उल्लंघन केल्याची तक्रार देवानानी यांनी निवडणूक आयोगाकडे गेली. ‘अलवर या लोकसभेच्या जागेवर काँग्रेसने कमकुवत उमेदवार उभा केल्यामुळे भाजपचा नक्की विजय होणार असल्याचे उमेदवार प्रत्याशी जसवंत यादव यांनी म्हटले.’या तिन्ही जागेच्या फेरनिवडणूक जिंकण्यासाठी दोन्ही पक्षांनी ही आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. काँग्रेस आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्यासाठी ही निवडणूक जोमाने लढत आहे.

भ्रष्ट मंत्रीमंडळ, रुग्णवाहिनी घोटाळा, सरकारी जमिनीवर अतिक्रमण यासारख्या गोष्टीमुळे वसुंधरा सरकारच्या विरोधात विरोधी पक्षांनी रान पेटविले होते. या सर्व घटनांमुळे वसुंधरा सरकारवरील जनतेचा विश्वास हळूहळू कमी होताना दिसत आहे. काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष सचिन पायलट यांच्या बदल जनतेत चांगली प्रतिमा उभी राहताना दिसत असून भाजपने काँग्रेस मुक्त अभियानमुळे देशात सत्ते आली होती. जर भाजपा सरकार सतत भ्रष्टाचार आणि घोटाळामुळे चर्चेत राहिली तर काँग्रेस पुढील काळात भाजपा मुक्त अभियान प्रारंभ करण्यास फार वेळ लागणार नाही.

Related posts

काँग्रेस हाच देशासाठी आणि लोकशाहीसाठी सक्षम पर्याय!

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली सीडीएस बिपीन रावत यांना श्रद्धांजली

News Desk

पाऊसही टीम इंडियाला फायनलमध्ये पोहोचवू शकतो

News Desk