HW News Marathi
महाराष्ट्र

राऊतांच्या नागपूरमधील सभेतील रोषणाई चोरीची; आता महावितरणच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष

मुंबई। सध्या राज्यात वीज टंचाईचे मोठे संकट आहे. वीज टंचाईमुळे राज्यभरात भारनियमन सुरू आहे. आणि राज्यातील जनता एका बाजुला उष्णतेता तडाखा बसला आहे तर दुसऱ्या बाजूला वीज टंचाईमुळे भारनियमन सुरू झाले आहे. यातच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची नागपूरमधील गुरुवारी (२१ एप्रिल) सभेसाठी वापरलेली वीज ही चोरीची असल्याची माहिती समोर आली आहे.

राऊतांच्या सभेत वापरण्यात आलेल्या रोषणाईसह स्पीकर इतर सर्व गोष्टी या वीज आकडे टाकून थेट महावितरणच्या वीज वाहिनीवरून चोरट्या पद्धतीने घेण्यात आली होती. यामुळे आता ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत या प्रकरणात कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, नागपूरमध्ये राऊतांची सभा सुरू असताना मुंबई मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत ऊर्जा मंत्र्यांची वर्षा निवासस्थानी बैठक सुरू होती. या बैठकीत नंतर राऊतांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले, “राज्यात कोळशाच्या टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे राज्य वीज संकट निर्माण झाले आहे. ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात वीज चोरीच्या घटना होत आहेत. त्याच ठिकाणी भारनियमन होत आहे. वीज चोरी करणाऱ्य विरोधात महावितरण कारवाई करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.”

या संपूर्ण प्रकरणाबद्दल राऊतांना कळाल्यावर ते म्हणाले, “मला कळाले, वीज चोरी झाली आहे. या प्रकरणी आम्ही पक्षांतर्गत समिती स्थापन करू आणि त्यांची चौकशी करू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवार सर्वोच्च नेते, त्यांची कोणाला ॲलर्जी असण्याचं कारण नाही – छगन भुजबळ

News Desk

वायुगळतीचा ‘भोपाळ ते तारापूर’ असा जीवघेणा प्रवास म्हणायचे ?

News Desk

‘हे तर उशिरा सुचलेलं शहाणपण’, राज्य सरकारच्या अध्यादेशाच्या निर्णयावर भाजपची टीका!

News Desk