HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

संजय शिरसाट नाराज? ट्विट मध्ये उद्धव ठाकरेंचं उल्लेख

शिंदे गटाने बंड पुकारल्या नंतर राज्यात राजकीय भूकंप आल्याचं पाहायला मिळालं. सध्या एकनाथ शिंदे यांच्या सोबत 50 अमदार आहेत त्यापैकी 40 आमदार मंत्री पदासाठी आशावादी असल्याचं बोललं जातंय माञ सर्वांचं मंत्री पद देणं शक्य नाही. सुरुवातीपासून औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट एकनाथ शिंदे सोबत होते. अनेक वेळा शिवसेनेकडून त्याच सोबत इतर पक्षाकडून अस म्हटल जात होत की मंत्री मंडळ विस्तार झाल्यानंतर शिंदे गटात नाराजी पाहायला मिळणार. औरंगाबादचे शिवसेनेचे माझी खासदार चंद्रकांत खैरे यांनी असही म्हटलं होत की मंत्री मंडळ विस्तार झल्यानातर शिंदे गटात आपापसात हाणामारी होणार मात्र शिंदे गटाच्या नेत्यांनी या सर्व टीकांना फेटाळून लावल आणि नेहमी त्यांच्याकडून अस सागितलं गेलं की आम्ही मंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांच्या सोबत नाही तर त्यांचे विचार आम्हाला पटलेत म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहोत. 4० दिवस सरकार स्थापन होऊन उलटल्या नंतर शिंदे फडणविस सरकारचा पाहिल्या टप्प्याचा मंत्री मंडळ विस्तार पार पडला ज्यात १८ मंत्र्यांनी शपथ घेतली. शिंदे गाटातील ९ मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. मंत्री पदासाठी संजय शिरसाट यांचं नाव सुरुवातीपासूनच आघाडीवर होत मात्र त्यांना मंत्री पदापासून लांब ठेवण्यात आल. त्या नंतर पुन्हा एकदा चर्चांना उधाण आल. मंत्र पद न मिळाल्यामुळे मी नाराज नाही अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली.

मात्र संजय शिरसाट यांनी काल एक ट्विट केलं होत त्या ट्वीतमुळे या चर्चांना खत पाणी मिळालं आहे. ट्या ट्विट मध्ये शिरसाट यांनी काय लिहिलं होत पाहुयात.

महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आदरणीय उध्दव ठाकरे साहेब. टि्वट सोबतचं विधानसभेतलं उद्धव ठाकरेंचं एक भाषण देखील त्यांनी जोडलं होतं. मात्र, काही वेळातचं त्यांनी हे ट्वीट डिलीट देखील केलं. एवढंच नाही तर शिरसाट यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटचा प्रोफाइल फोटो देखील बदलला होता. त्यांच्या प्रोफाइल मध्ये उद्धव ठाकरे यांचं फोटो दिसून आल. मात्र काही वेळातच ट्विट आणि प्रोफाइल फोटो डिलीट करण्यात आल. तर आज याविषयी शिरसाट यांनी मध्यांनशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान ते म्हणाले,”राजकारण सगळ्यांना पुढे जायचे असते. त्यामुळं मंत्री व्हावे ही माझी इच्छा असल्याचे मत शिंदे गटाचे औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केले. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांबरोबरच आहे आणि त्यांच्यासोबच राहणार असल्याचे शिरसाट म्हणाले. काल गेलेली पोस्ट चुकून गेली होती. माझ्या मोबाईलचा टेक्निकल प्रॉब्लेम झाल्यामुळं ती पोस्ट गेल्याचा खुलासा शिरसाट यांनी केला. पुढे ते म्हणाले,” मी कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी केली आहे. मला औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्रीपद द्यावे, अशी मागणी की एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

औरंगाबादक्या दोन आमदारांना मंत्री मंडळात स्थान मिळालं आहे संदीपान भूमारे आणि अब्दुल सत्तार यांना. संजय शिरसाट यांना पालक मंत्री पद देण्यात येत का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्याचं सोबत जर त्यांची मागणी पूर्ण झाली नाही तर पुनः एकदा त्यांची नाराजी समोर येते का हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरी कडे मातोश्रींचे दार आजही आमदरांसाठी उघडे असल्याचं बोललं जातंय आता पुढे काय होणार या कडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी घेतला अखेरचा श्वास

News Desk

मनी लाॅन्ड्रिंग प्रकरणी ईडीने कारवाई करू नये, सरनाईकांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

News Desk

बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून निर्माण होणारा एकोपा महत्त्वाचा! – सुनील केदार

Aprna