HW News Marathi
देश / विदेश

नव्या वर्षात रोजगारसंधीसाठी मोदी सरकार राबविणार नवी योजना

नवी दिल्ली | आपल्या देशातील अनेक समस्यांपैकी बेरोजगारी ही एक गंभीर समस्या आहे. या समस्येवर उपाय म्हणून येत्या नव्या वर्षात आता मोदी सरकारकडून एक नवी योजना राबविण्यात येणार आहे. वरुण मित्र योजनेंतर्गत १ जानेवारी २०१९ पासून मोदी सरकार मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध करून देण्यास सुरुवात करणार असल्याची माहिती मिळत आहे.

मिनिस्ट्री ऑफ एम.एन.आर.ई आणि एन.आय.एस.ई कडून आयोजित करण्यात आलेल्या या योजनेंतर्गत सरकारकडून लोकांना तीन आठवड्यांची मोफत ट्रेनिंग दिली जाणार आहे. १ जानेवारी ते १९ जानेवारी २०१९ या कालावधीत या योजनेंतर्गत ट्रेनिंग सुरू राहणार आहे. यासाठी जवळपास १२० तास वर्ग घेतले जाणार आहेत. यासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २८ डिसेंबर ही आहे.

विशेष म्हणजे या योजनेमुळे देशातील तरुणांचा नोकरीचा प्रश्न मिटणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्याचप्रमाणे, या योजनेमुळे केवळ नोकरी मिळविण्यासाठीच नव्हे तर जास्त पगार मिळविण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. ज्यात जवळपास 120 तास क्लास दिले जाणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

गुजरातमध्ये जीप आणि ट्रकचा भीषण अपघात, डोंबिवलीतील ११ जणांचा मृत्यू

News Desk

धोका टळला | चीनचे स्पेस स्टेशन पॅसिफिक महासागरात कोसळले

News Desk

शरद पवार सुधारणांच्या बाजूने, राजकारणासाठी काहींचा यूटर्न, मोदींचा थेट पवारांना टोला

News Desk
राजकारण

राम मंदिराचा मुद्दा सोडणार नाही, सोडू देणार नाही !

News Desk

मुंबई |राम मंदिर बांधणार म्हणजे बांधणारच,”, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या मुद्दावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पुढे उद्धव ठाकरे असे देखील म्हणाले की, कुभ कर्णाला जागे करण्यासाठी अयोध्येला गेलो होतो. जोपर्यंत राममंदिर बांधणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. कुंभकर्ण वेळत जागा झाला नाही, तर हिंदु पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. अयोध्येनंतर आम्ही आता पंढरपूरात कुंभकर्णाला जागे करण्यासाठी आलो आहे.

“तुम्ही आमच्या हिंदु देवतांच्या नावाचे राजकारण करून नका. आम्ही ते कदापि खपवून घेणार नाही”, असा इशारा उद्धव ठाकरेंनी सभेच्या शेवटी भाजपला इशारा दिला आहे. तसेच सोहराबुद्दीन शेखचा फेक एन्काउंटर प्रकरणी सर्व जणांची सुद्धा निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. परंतु, बाबरी मशीद पाडणाऱ्यावऱ्या कारसेवकांवरील गुन्हे आजही कायम आहेत. तुम्हाला वाटते तर तुम्ही त्यांच्यावरील केस त्या कारसेवकांची मुक्तता करा.

गेल्या ३० वर्षापासून अयोध्येचा मुद्दा कोर्टात रखडला आहे. हे तुम्हा बाबरी मजीद पाडताना लक्ष्यात नाही आले. परंतु राम मंदिर बांधताना तुम्ही सांगता की, राम मंदिराचा मुद्दा कोर्टा असल्याची आठवण येते. पंढरपुरातील जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी शेतकरी, पीक विमाव योजना, दुष्काळ अशा विविध मुद्यांवरून केंद्र आणि राज्य सरकारला धारेवर धरले आहे.

 

Related posts

गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी प्रमोद सावंत यांची नियुक्ती होण्याची शक्यता ?

News Desk

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना जामीन मंजूर

Aprna

माजी आमदार संदीप बजोरिया आयकर खात्याच्या रडारवर

News Desk