HW News Marathi
राजकारण

#Results2018 : वसुंधरा राजे जिंकल्या, भाजप हारले

नवी दिल्ली | गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा यावेळीही कायम राहिली आहे. राजस्थानमध्ये दर निवडणूकांमध्ये सत्ता पालट होत असते. हिच परंपरा कायम राहिलेली आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे या विजयी झाल्या आहेत. राजस्थानमधील झालरपाटन मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवत २७ हजार ९२ मतांनी विजय मिळला आहे.

तसेच भाजपाचे सरकार राजस्थानमध्ये कायम राखण्यात त्यांना अपयश आले आहे. काँग्रेसकडून अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांनी सत्ता काबीज करण्यासाठी कसून परिश्रम घेतले होते. त्या प्रयत्नांना यश आले आहे. गेल्या वीस वर्षांत कुठल्याच पक्षाला राजस्थानमध्ये सलग दोन टर्म सत्ता काय राखता आलेली नाही. काँग्रेस आणि भाजप यांची राजस्थानात आलटून पालटून सत्ता येत असते. ही परंपरा मोडून काढण्याची संधी वसुंधरा राजे यांनी गमावली.

राजस्थानमध्ये विधानसभेच्या २०० जागा असून १९९ जागांसाठी मतदान झाले. राजस्थानात बहुमताचा आकडा १०१ आहे. तर कॉंग्रेसने १०४ जागा पटकावल्या आहे. राजस्थानमध्ये कॉंग्रेसचीच सत्ता येणार असल्याच कॉंग्रेस नेते सचिन पायलट यांनी म्हटलयो

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महाआघाडीत पहिली संयुक्त प्रचार सभा २० फेब्रुवारी | अशोक चव्हाण

News Desk

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का,  माजी पाणीपुरवठा मंत्री शिवसेनेत करणार प्रवेश ?

News Desk

ज्यांची भांडणे ही विनोदी वाटतात, ते युध्दाची भाषा करत, भागवंतांच्या वक्तव्याची- धनंजय मुंडे ची खिल्ली

swarit
मुंबई

आमदार बच्चू कडू यांना एक वर्षांची शिक्षा

swarit

अमरावती – अचलपूरचे अपक्ष आमदार आणि प्रहार युवा संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांना वाहतूक पोलिसाला मारहाण प्रकरणी एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अचलपूर सत्र न्यायालयाने एक वर्षे कारावास आणि ६०० रुपये दंड ठोठावला आहे. वाहतूक पोलीस इंद्रजीत चौधरीला आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती.

‘पोलिसांनी योग्य पद्धतीने वाहतूक नियंत्रित न केल्यामुळे त्या परिसरात अनेक अपघात झाले आहेत. यासंदर्भात लोकप्रतिनिधी म्हणून विचारले असता. या पोलिसांनी उद्धटपणे उत्तर दिले असून त्यानंतर आमच्यात फक्त शाब्दिक वादावादी झाला पण, मारहाणीचा आरोप बच्चू कडू यांनी फेटाळला आहे.’

ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे तीन वेळा अपक्ष आमदार म्हणून निवडून गेले आहेत. प्रहार युवा संघटना स्थापन केली आहे. या संघटनेच्या माध्यमातून शेतकरी आणि विविध सामाजिक विषयांवर आंदोलन करत असतात.

Related posts

मनसे नेते संदीप देशपांडेंवर अज्ञात इसमांकडून हल्ला; हाताला फ्रॅक्चर तर पायाला दुखापत

Aprna

उल्हासनगरमध्ये ‘स्पेशल 26’ चं रॅकेट उध्वस्त

News Desk

शनिवार ठरला अपघातवार एक दिवस.. 7 अपघात.. 30 ठार..

Adil