HW News Marathi
देश / विदेश

विमान प्रवासात संशयास्पद हालचाली करणाऱ्या तरुणास अटक

मुंबई | कोलकत्त्याहून मुंबईला येणाऱ्या विमानामध्ये एका तरुणाला सोमवारी(२६ नोव्हेंबर)ला सकाळी अटक करण्यात आले आहे. विमानात स्फोट घडवून आणण्याबाबत हा तरुण आपल्या फोन वरुन एका व्यक्तिसोबत संवाद साधत होता. या तरुणाचे संशयास्पद वागणे लक्षात येताच विमान उडण्याआधीच त्या तरुणाला विमानतळावरील पोलीसांनी अटक केली.

वेदान पोद्दार असे या तरुणाचे नाव असून हा कोलकत्त्याहून मुंबईला येणाऱ्या 9W472 जेटएअरवेजच्या विमानातून तो प्रवास करणार होता. विमानात वेदान आसनावर बसला असताना त्याचे वर्तन संशयास्पद वाटले होते. वेदान याने आपल्या तोंडावर रुमाल बांधला होता. त्याच ठिकाणी त्याने सेल्फी काढून आक्षेपार्ह कमेंटसह वॉट्सएपवर पाठवून मेसेज करायला सुरुवात केली होती.

वेदानच्या शेजारी बसलेल्या सहप्रवाशाला वेदानचे वर्तन संशयास्पद वाटले. त्याचा वॉट्सएप मॅसेज सहप्रवाश्याने पाहिले असता त्यात एक विचित्र संदेश लिहीला होता. तेव्हा त्या सहप्रवाश्याने ती बाब केबिन क्रूच्या लक्षात आणून दिली. तात्काळच विमानतळ पोलिसांशी संपर्क करुन वेदानला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास सीआयएसएफ करणार आहे. वेदान पोद्दार हा कोलकाताचा रहीवासी असून मुंबईला नोकरीच्या मुलाखतीसाठी येत असल्याचे चौकशीत समोर आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यात मलाही अटक झाली होती – नरेंद्र मोदी

News Desk

न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांची भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती; ९ नोव्हेंबरला घेणार शपथ

Aprna

“वाह रे मोदी तेरा खेल”; इंधन दरवाढीविरोधात युवा काँग्रेस आक्रमक

News Desk
महाराष्ट्र

अखेर गडावरून सुखरुप सुटका

News Desk

मुंबई | हरिश्चंद्रगड येथील कोकणकड्याच्या पायथ्याला अडकलेल्या २० ट्रेकर्सची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. एनडीआरएफच्या मदतीने या ट्रेकर्संना वाचविण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. असे असले तरी ट्रेकर्संना बेस कॅम्पपर्यंत पोहचण्यासाठी आणखी काही तासांचा कालावधी लागणार आहे. सूर्योदय झाल्यानंतर त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी त्यांच्यापर्यंत ‘न्याहारी’चे खाद्यपदार्थ, पाणी, ग्लुकोज, चहा, बिस्किटे पोहोचविली. त्यानंतर त्यांनी सोबत असलेल्या व्यावसायिक प्रशिक्षित ट्रेकर्स च्या मदतीने गड उतरण्यास सुरुवात केली आहे.

कल्याणचे डॉ. हितेश अडवाणी हे २० जणांसोबत हरिशचंद्रगड येथे ट्रेकिंसाठी गेले होते. यामध्ये ५ महिला आणि त्या ठिकाणाहून दिड किलोमीटर पुढे १०० फूट खाली हे सर्व ट्रेकर्स अडकले होते. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कल्याण तहसीलदार आणि पोलीस यांना देखील यासंदर्भात समन्वय ठेऊन ट्रेकर्सची सुटका करण्याबाबत निर्देश दिले होते. ठाण्याहूनही काही ट्रेकर्सची यासाठी मदत घेतली जात आहे. या ट्रेकर्संना काळोख्या गडावर रात्र काढावी लागली.

Related posts

ज्ञानासाठी विद्यार्थ्यांना तुडवावा लागतोय गुडघाभर चिखल, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

Manasi Devkar

पुन्हा एकदा अजित पवार-देवेंद्र फडणवीस नव्या वर्षात एकाच मंचावर येणार!

News Desk

आमचा दसरा कडवट झाला तर तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही – राजू शेट्टीं

News Desk