HW News Marathi
महाराष्ट्र

आमचा दसरा कडवट झाला तर तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही – राजू शेट्टीं

मुंबई। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी १९ ऑक्टोबरला जयसिंगपूर येथे २० वी ऊस परिषद होणार असल्याचं जाहीर केलं आहे. तसंच यावेळी त्यांनी ‘जागर एफआरपीचा, आराधना शक्तीस्थळांची’ या आंदोलनाची घोषणा केली आहे.ऊस तुटल्यावर १४ दिवसात ६० टक्के एफआरपी त्यानंतर पुढच्या १४ दिवसात २० टक्के एफआरपी आणि त्यानंतर दोन महिन्यात २० टक्के एफआरपी द्यावी अशी शिफारस केली आहे,” अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. आमचा दसरा कडवट झाला तर राज्यकर्त्यांनो तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही असा इशारा यावेळी त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारला दिला.

शेतकऱ्यांना चार पैसे देण्याचं साखर कारखानदार यांच्या मनात नाही

एफआरपी चे तुकडे करणाऱ्यांच्या विरोधात नवरात्रीपासून या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. जोतिबाच्या डोंगरावरून आंदोलनाला सुरुवात होईल अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. दसऱ्याला जेजुरी येथे मेळावा घेत आंदोलनाची सांगता होईल. ते कोल्हापुरात बोलत होते.“शेतकऱ्यांना चार पैसे देण्याचं साखर कारखानदार यांच्या मनात नाही. त्यामुळे निती आयोगाला हाताला धरून एफआरपीचे तुकडे पाडण्याचे काम सुरू केले आहे. एफआरपीचे तुकडे करण्याचं काम भाजपनं केलं आणि तेच पुण्यात आंदोलन करत आहेत,” अशी टीका राजू शेट्टी यांनी यावेळी केली.

१९ ऑक्टोबर रोजी २० वी ऊस परिषद होणार

“ऊसाच्या एफआरपीसाठी घटस्थापनेपासून जोतिबाचे दर्शन घेऊन आंदोलनाला सुरुवात केली जाईल. जोतिबा, अंबाबाई, बाळू मामा यांचं दर्शन घेऊन आंदोलनाला सुरुवात होणार. १९ ऑक्टोबर रोजी २० वी ऊस परिषद होणार असून कुणाची परवानगी मागणार नाही,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील आपत्कालिन स्थितीबाबत अजित पवारांची संरक्षणमंत्री राजनाथसिंहांशी चर्चा

News Desk

“माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार!” – मलिकांच्या ट्वीटने चर्चेला उधाण

News Desk

भावना गवळींकडून जीवाला धोका, शिवसेना नेत्यानेच केला गंभीर आरोप!

News Desk