HW News Marathi
राजकारण

मराठा क्रांती मोर्चा पुन्हा एकदा विधानभवनावर धडकणार

मुंबई | मराठा क्रांती मोर्चा प्रमुख वीस मागण्या घेऊन सोमवारी (२६ नोव्हेंबर) विधानभवनावर पुन्हा एकदा धडकणार आहे. या निर्णायक आंदोलनासाठी मराठा समाज आपल्या वाहनांसह मुंबईत दाखल होत असल्याने राजधानीत मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून, पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

मराठा आरक्षणाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर झाल्यानंतर मराठा समाजाला किती टक्के व कोणत्या प्रवर्गातून कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण सरकार देणार, याबाबत मराठा समाजाचे लक्ष लागले आहे. त्यासाठी आरक्षणासह प्रमुख वीस मागण्यांसाठी पुन्हा एकदा ‘चलो मुंबई’ची हाक देण्यात आली आहे.

सोमवारी होणार्‍या आंदोलनासाठी १६ नोव्हेंबरपासून गावोगावी मराठा संवाद यात्रा काढून जनजागृती करण्यात आली असून, या यात्रेला मिळालेला प्रतिसाद पाहता लाखो मराठा बांधव सोमवारी मुंबईत धडकतील. तसेच हजारो वाहने मुंबईत दाखल होणार असल्याचा समन्वयकांचा दावा आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे करणार आंदोलन ?

News Desk

मनसे १०० जागांवर विधानसभा निवडणूक लढविणार ?

News Desk

संजय राऊतांनी आईला लिहिले भावनिक पत्र; जाणून घ्या…नेमके काय म्हटले

Aprna
मुंबई

मुंब्रा बायपास रोडवर दोन कंटेनर आदळून अपघात

News Desk

मुंब्रा | मुंब्रा बायपास रोडवरील घाटात दोन कंटेनर आदळून घरावर कोसळल्याची घटना आज(२६ नोव्हेंबर)ला पहाटे ५ वाजता सुमारास घडली आहे. चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये घराचे मोठे नुकसान झाले असून घरातील तिघे जखमी झाले आहेत.

दिनेश आवटे (वय ३) याच्या हाताला तर घरमालक बाबू आवटे यांच्या पत्नी भाग्यश्री यांच्या पायाला किंचित दुखापत झाली आहे. कंटेनर चालक अब्दुल मना याला गंभीर दुखापत झाली असून त्याला जवळच्या रुग्णालयातमध्ये दाखल करण्यात आले आहे.

ही दुर्घटना मुंब्रा देवी मंदिराच्या समोरील हनुमान मंदिराजवळ घडली आहे. घटनास्थळी वाहतूक कोंडी झाली असून दुसऱ्या बाजुने एकेरी वाहतुकही सोडण्यात आली आहे. पोलीस, पालिकेचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून दोन्ही कंटेनर काढण्याचे काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे.

Related posts

ग्रामीण भागातील जीवनावर आधारित चित्र प्रदर्शन

swarit

पुणे – सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू तर सहा जण जखमी

News Desk

वरळी कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेचा जल्लोष

News Desk