HW News Marathi
राजकारण

#मीटू : एम. जे. अकबर यांची ९७ वकिलांची फौज

नवी दिल्ली | मीटू मोहिमेतून एका महिला पत्रकारने केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. या महिला पत्रकाराविरोधात अकबर यांनी मानहानीचा दावा केला आहे. अकबर यांनी स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी जवळपास ९७ वकिलांची फौज न्यायालयात उभी करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

अकबर यांच्यासाठी करांजवाला अँड कंपनी ही लॉ फॉर्म मैदानात उतरणार आहे. यात केवळ ३५ महिला वकील असून या ९७ वकीलांपैकी केवळ ६ विकलच प्रत्यक्ष न्यायालयात अकबर यांची बाजू मांडतील, असे करांजवाला अँड कंपनीकडून सांगण्यात आले आहे. एम. जे. अकबर संपादक पदावर असताना त्यांनी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप १० महिलांनी केला आहे.

मात्र हे आरोप खोटे असल्याचे अकबर यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीआधी आपली प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूनेच हे आरोप होत असल्याचं त्यांनी म्हटले आहे. अकबर यांनी निर्दोष सिद्ध करण्यासाठी सर्व महिलांना विरोधात मानहानीचा दावा केला आहे. या महिलांसाठी न्यायालयात खेचले असून यांच्या विरोधात न्यायालयात ९७ वकीलांची फौज सज्ज आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी !

News Desk

बारामतीच्या नेत्याचा मी बंदोबस्त करणार !

News Desk

जे रावणाच्या लंकेत घडले, ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार ?

News Desk
देश / विदेश

2007 Hyderabad Twin Blasts Case | एनआयए स्पेशल कोर्टाने आरोपींना ठरवले दोषी

News Desk

हैद्राबाद | हैद्राबादमध्ये २५ ऑगस्ट २००७ रोजी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयए स्पेशल कोर्टाने मंगळवारी आरोपींना दोषी ठरवले आहे. मंगळवारी कोर्टाने आपला निर्णय जाहीर करताना अनिक शफीक सय्यद आणि मोहम्मद अकबर यांना दोषी ठरवले आहे. तर दोन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

या स्फोटामध्ये ४२ लोकांचा मृत्यू झाला होता तर ५० पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. या दोन बॉम्ब स्फोटामध्ये एक स्फोट गोकुल चाट भंडारमध्ये तर दुसरा व्यस्तम टूरिस्ट स्पॉट लुम्ब‍िनी पार्क येथे झाला होता.

Related posts

आज कमांडर अभिनंदन वाघा बॉर्डरवरून परतणार मायदेशी, संपूर्ण भारताचे लक्ष

News Desk

नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांची प्रगती! – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Manasi Devkar

‘मोदी सरकारच्या कार्यकाळात राममंदिर होणारच नाही’

News Desk