HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीस सरकारमुळे राज्यावर अडीच लाख कोटींचे कर्ज | पवार

नवी मुंबईसरकारने राज्यावर अडीच लाख कोटींचे कर्ज थोपवले आहे”, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप सरकारवर केली आहे. “भाजपने २०१४च्या निवडणुकांमध्ये अनेक आश्वासन दिली. परंतु ती आश्वासन पाळली गेली नाहीत. भाजपने जनतेचा विश्वासघात केला आहे, असा टोला देखील पवारांनी यावेळी लगावला. वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात कोकण विभाग राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्यात अजित पवार बोलत होते.

“सरकारची प्रशासनावर पकड नाही. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु ते देखील कमी केली नाही. राज्यात दुष्काळजन्य परिस्तिथी ओढवली आहे. तरीही दुष्काळ घोषित केला जात नाही. नोटा बंदीमुळे प्राप्त झालेल्या काळ्या पैश्याचा हिशेब अजून केंद्रीय अर्थमंत्री आणि आरबीआयचे गव्हर्नर यांनी दिला नाही. शिवाजी महाराजांच्या स्मारकाची उंची कमी करण्याचे प्रयत्न सुरु आहे”,असा आरोप देखील पवारांनी यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर लावला.

पवार असेही म्हंटले की, “भाजप पक्षाचेच अनेक ज्येष्ठ नेते नाराज आहेत”. राज्यात सुमारे अडीच लाख जागा रिक्त आहेत. ‘राष्ट्रवादीचे सरकार आल्यास तरुणांना रोजगार प्राप्त करुन दिला जाईल. एका ही जागा रिक्त ठेवण्यात येणार नाही’. असे आश्वासन पवारांनी यावेळी उपस्थितांना आले. या मेळाव्यामध्ये अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार सुद्धा उपस्थित होता. पार्थ याची उपस्थिती हा चर्चेचा बनला होता. पार्थच्या राजकारणातील पुढील वाटचाली बद्दल विचारले असता,’पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील’ असे पवार यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘कालपर्यंत दिसणारं उभं गाव आता स्मशानात,’ एकाच रांगेत 40 मृतदेह…!

News Desk

शरद पवारांच्या पे रोलवर राहण्यापेक्षा शिवसैनिकांच्या व्यथा मांडा, चंद्रकांत पाटलांचा राऊतांना सल्ला

News Desk

मराठी भाषा भवन सर्वांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल! – सुभाष देसाई

Aprna
मुंबई

डोंबिवलीमध्ये एमआयडीसीतील झेनिथ रबर कंपनीला आग

News Desk

डोंबिवली | एमआयडीसी परिसरातील झेनिथ रबर कंपनीला सोमवारी मध्यरात्री आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

 

अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आण्याचे प्रयत्न सुरू आहे. आगीची माहिती मिळताच केडीएमसीच्या महापौर विनिता राणे, नगरसेवक विश्वानाथ राणे आदींनी घटनास्थळी दाखल झाले.

Related posts

सर्वोच्च न्यायालयाकडून प्रताप सरनाईकांना दिलासा!

News Desk

कल्याण डोंबिवलीत धावणार महिलांसाठी तेजस्विनी बस

News Desk

मुंबईतील पायाभूत सोयी-सुविधांबाबत पंतप्रधान मोदींनी केले भाष्य

News Desk