HW News Marathi
देश / विदेश

रशियाचे राष्ट्रपती पुतीन आजपासून भारत दौऱ्यावर

नवी दिल्ली । रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन हे आजपासून भारत दौऱ्यावर असणार आहेत. भारत आणि रशियामध्ये एस-४०० क्षेपणास्त्र करार होणार असल्याची माहिती मिळत आहे. या करारासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. एस-४०० क्षेपणास्त्र प्रणालीसाठीचा हा करार ५अब्ज डॉलरचा असणार आहे. पुतीन हे यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. तर शुक्रवारी पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांच्यात चर्चा होणार आहे.

भारताने रशियाच्या ऊर्जा क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. भारत-रशिया या दोन्ही देशांचे मैत्रीपूर्ण संबंध आणि संरक्षण कराराच्या दृष्टीने पुतीन यांची ही भारतभेट अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे या भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. त्याचबरोबर अंतराळ क्षेत्रातील संशोधन आणि उर्जा क्षेत्रातील सहकार्याच्या मुद्द्यावरदेखील यावेळी चर्चा करण्यात येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०२२ साली मानवाला चंद्रावर पाठवण्याच्या मोहिमेसाठी रशिया भारताला प्रशिक्षण देण्याची देखील शक्यता वर्तविण्यात येत आहे. या दौ-यात एस-४०० क्षेपणास्त्र प्रणालीसंदर्भात पुतिन आणि पंतप्रधान मोदी यांच्यातअधिकृत चर्चा करणार आहेत, अशी माहिती रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. भारताची दरवर्षी होत असलेल्या द्विपक्षीय चर्चांमध्येदेखील रशियाचा समावेश आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

युद्ध नाही तर चर्चेच्या मार्गानेच काश्मीर प्रश्न मार्गी लागेल !

News Desk

#AyodhyaVerdict : अयोध्या निकालानंतर व्यक्त होणे टाळा, अफवांवर विश्वास ठेऊ नका

News Desk

जीएसटीचा सर्वसामन्यांना भूर्दंड, ग्राहकांच्या खिशाला कात्री

News Desk
देश / विदेश

कुलभूषण जाधव प्रकरणी ‘आयसीजे’ करणार फेब्रुवारीत अंतिम सुनावणी 

swarit

नवी दिल्ली |भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी अंतिम सुनावणी फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. जाधव यांच्यावर पाकिस्ताने हेरगिरी केल्याचा आरोप केला आहे. जाधव यांनी इराण मार्गे पाकिस्तानमध्ये प्रवेश केला होता. पाकिस्तानाच्या दाव्यानुसार जाधव यांना मार्च २०१६ रोजी बलुचिस्तानमध्ये अटक करण्यात आले होते. परंतु भारताने पाकचे सर्व दावे फेटाळून लावले असून पाकने जाधव यांचे इराण मधून अपहरण कले असल्याचा दावा भारताने केला आहे.

पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने हेरगिरीचा आरोप करत जाधव यांना गेल्या वर्षी फाशीची शिक्षा सुनावली होती. या निर्णयावर भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेऊन ‘आयसीजे’ने जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. परंतु जाधव प्रकरणी संयुक्त राष्ट्र संघाच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) पुन्हा एकदा १८ फेब्रुवारी २०१९ पासून सुनावणीला सुरुवात होणार आहे.

कुलभूषण यांची आयसीजेमध्ये अशी असणार सुनावणी

ही सुनावणी १८ ते २१ फेब्रुवारी २०१९ या दरम्यान कुलभूषण जाधव यांची सुनावणी आयसीजेमध्ये होणार आहे. सुनावणीच्या पहिल्या फेरीत १८ फेब्रुवारीला सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत भारत आपली बाजू मांडणार आहे. तर १९ फेब्रुवारीला सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत पाकिस्तान त्यांची बाजू मांडणार आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या फेरीत २० फेब्रुवारीला दुपारी ३ ते ४.३० पर्यंत भारताला आणि पाकिस्तानला सुद्धा २१ फेब्रुवारीला सायंकाळी ४.३० ते ६ वाजेपर्यंत त्यांची बाजू मांडण्याची पुन्हा एकदा संधी मिळणार आहे.

Related posts

छत्रपती शिवरायांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान होऊनही भाजपचे तोंड बंद !

News Desk

फडणवीस आणि राज्यपालांच्या भेटीबद्दल राजकीय वर्तृळात रंगल्या चर्चा

News Desk

भारत-चीन मुद्द्यावर पंतप्रधानांची आज सर्वपक्षीय बैठक, २० पक्षाध्यक्षांचा असेल सहभाग

News Desk