HW News Marathi
महाराष्ट्र

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी युवकाची आत्महत्या

परभणी | गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचे आंदोलन पेटले आहे. दरम्यान आरक्षणासाठी काही युवकांनी आपल्या प्राणांची आहुती देखील दिली. आता मराठा समाजापाठोपाठ आत्महत्येचे लोण धनगर समाजातही पसरण्याचे शक्यता दिसून येत आहे. जिल्ह्यात धनगर समाजाच्या आरक्षणासाठी एका युवकाने आत्महत्या केली. सेलू तालुक्यातील गोमेवाकडी येथील १९ वर्षीय योगेश राधाकिशन कारके या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

रविवारी दुपारच्या सुमारास योगेश या धनगर समाजाच्या युवकाने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी योगेशने आपल्या मोबाईल फोनवरुन बी. शिंदे या व्यक्तीला आत्महत्या करत असल्याचा मेसेज केला होता. परंतू रेंज नसल्यामुळे हा मेसेज मोबाईलमधून गेलेला नसल्याचे काही खात्रीलायक सुत्रांकडून माहीत मिळत आहे. याआधी देखील औरंगाबादच्या पैठणमध्ये धनगर समाजाच्या युवकाने आत्महत्या केली होती.

त्यामुळे मराठा समाजापाठोपाठ आता राज्यात आरक्षणासाठी धनगर समाजातील तरुण देखील आत्महत्येचे पाउल उचलताना पहायला मिळत आहे. आरक्षणाच्या मुद्यावरुन धनगर युवकाची ही दुसरी आत्महत्या आहे. सदर तरुणांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १० लाखाची मदत आणि घरातील एकाला शासकीय सेवेत घेण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

रामनवमी आणि हनुमान जयंती दिवशी महाराष्ट्रात जातीय दंगली झाल्या नाही, तुम्हाला याचे दुःख, मिटकरींचा राज ठाकरेंना टोला

Aprna

अभिनेता गोविंदाच्या उपस्थितीत परळीत मोठ्या थाटात साजरा झाला शरद पवारांचा वाढदिवस !

News Desk

काँग्रेसचे ११ आमदार उपोषणाला बसणार !

News Desk
मुंबई

कल्याणमध्ये विहिरीत पडून पाच जणांचा मृत्यू

Gauri Tilekar

कल्याण | कल्याणमधील नेतीवली लोकग्राम येथील रसायनमिश्रित विहिरीत सफाईसाठी एक सफाई कामगार उतरला होता. त्यानंतर तो बराच वेळ विहिरी बाहेरतून बाहेर न आल्याने २ स्थानिक नागरिक सफाई कामगाराला वाचविण्यासाठी विहिरीत उतरले. परंतु तिघेही विहिरीतून बाहेर आले. यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले होते.

अग्निशमन दलाचे प्रमोद वाकचोरे आणि अनंत शेलार हे दोन जवान विहिरीत उतरले. मात्र ते देखील बाहेर आले नाही. त्यानंतर पाचजणही बुडाल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि घटनास्थळी गर्दी जमा झाली. ही घटना आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. घटनास्थळी पोलीस व अग्निशमन दलाचे पथक शोधमोहीम राबवत असताना पाचही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.

घटनास्थळी मदतीसाठी एनडीआरएफ, टीडीआरएफ आणि ठाणे महानगरपालिका अग्निशमन दलाची मदत पाठविण्यात आली आहे. पाचही मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अग्निशमन दलाचे जवान अनंत शेलार, प्रमोद वाकचोरे, राहुल गोस्वामी (मुलगा) आणि गुणाभाई गोस्वामी (वडील) यांचे मृतदेह सापडले असून अन्य एका मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.

Related posts

लोकलमध्ये मंगळसूत्र चोरून ट्रॅकवर उडी मारणारी महिला पोलिसांच्या ताब्यात

News Desk

 जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या पार्श्वभूमीचं विश्लेषण

News Desk

लागला एकदाचा टीवाय बीकॉमचा ‘निक्काल’!

News Desk