HW News Marathi
महाराष्ट्र

सनातन संस्थांवर बंदी घाला, अशोक चव्हाण यांची मागणी

मुंबई | दहशतवादी विरोधी पथकाने नालासोपाऱ्यातील सनातन संस्थेच्या तीन सदस्यांना अटक केली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली होती.

दहशतवादी विरोधी पथकाने नालासोपारा येथून २० बॉम्ब तसेच काही स्फोटके जप्त केली आहेत. नालासोपाऱ्यातून वैभव राऊत तर शरद काळसकर आणि गोंधळेकर या दोघांना वसईतून अटक केले आहे. स्वातंत्र्य दिवस, ईद, गणपती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरे केले जातात. या सणांमध्ये अनुचित घडविणे यामागचे षडयंत्र असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. तस भाजप सरकार सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणीवर गंभीर नसल्याचे चव्हाण यांनी बोलून दाखविले.

सरकारी वकीलांकडून न्यायालयात याप्रकरणी मोठा गौप्यस्फोट करण्यात आला असून आरोपींकडून ८ नाही तर २० बॉम्ब जप्त करण्यात आल्याची माहिती वकीलांनी दिली आहे. तसेच ५० बॉम्ब बनू शकतील इतके साहित्यही जप्त करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

फडणवीस सरकारचा अतिरिक्‍त अर्थसंकल्प बळीराजासाठी समर्पित

News Desk

ग्रामीण मुलींना मिळणार 12 वी पर्यंत एसटीचा मोफत सवलत पास

News Desk

उद्धव ठाकरेंच्या ‘या’ मागणीला आनंद महिंद्रांनी दर्शवला पाठिंबा

News Desk
देश / विदेश

2007 Hyderabad Twin Blasts Case | एनआयए स्पेशल कोर्टाने आरोपींना ठरवले दोषी

News Desk

हैद्राबाद | हैद्राबादमध्ये २५ ऑगस्ट २००७ रोजी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयए स्पेशल कोर्टाने मंगळवारी आरोपींना दोषी ठरवले आहे. मंगळवारी कोर्टाने आपला निर्णय जाहीर करताना अनिक शफीक सय्यद आणि मोहम्मद अकबर यांना दोषी ठरवले आहे. तर दोन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

या स्फोटामध्ये ४२ लोकांचा मृत्यू झाला होता तर ५० पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. या दोन बॉम्ब स्फोटामध्ये एक स्फोट गोकुल चाट भंडारमध्ये तर दुसरा व्यस्तम टूरिस्ट स्पॉट लुम्ब‍िनी पार्क येथे झाला होता.

Related posts

आज कमांडर अभिनंदन वाघा बॉर्डरवरून परतणार मायदेशी, संपूर्ण भारताचे लक्ष

News Desk

नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांची प्रगती! – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Manasi Devkar

‘मोदी सरकारच्या कार्यकाळात राममंदिर होणारच नाही’

News Desk