HW News Marathi
महाराष्ट्र

शहीद मेजर कौस्तुभ राणे पंचतत्वात विलीन

मुंबई | काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांची घुसखोरी रोखताना भारतीय लष्करातील मेजर कौस्तुभ प्रकाश राणे हे शहीद झाले. शहीद मेजर कौस्तुभ यांच्यावर आज लष्करी इतमामात आज दुपारी बाराच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. ठाणेच्या मिरारोड येथील नागरिकांनी कौस्तुभ यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे कौस्तुभ यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन राणे कुटुंबीयांचे सांत्वन केले. सोमवारी रात्री काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये घुसखोर दहशतवाद्यांशी लढताना चार जवानांना वीरमरण आले होते. यात मीरा रोडच्या शीतल नगर भागात राहणाऱ्या २९ वर्षांच्या मेजर कौस्तुभ प्रकाश राणे यांचाही समावेश आहे.

मेजर राणे यांच्या मातोश्री ज्योती, पत्नी कनिका, मुलगा अगस्त्य, बहिण कश्यपी यांनी स्मशानभूमीत अखेरची श्रध्दांजली वाहिली त्यावेळी भावनाविवश नागरिकांनी “भारतमाता की जय, माँ तुझे सलाम अशा जोरदार घोषणा दिल्या. यावेळी लष्कराच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महाराष्ट्रातलं सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, पंढरपूरात फडणवीसांनी उडवला राजकीय धुरळा !

News Desk

हर्षवर्धन पाटलांच्या शेजारी अजित पवार बसले ,कारण …

News Desk

शरद पवारांसारख्या राष्ट्रीय नेत्याच्या तोंडून चुकीची माहिती दिली गेली, देशमुखांवरुन फडणवीसांचा थेट आरोप

News Desk
क्राइम

दाऊदच्या खंडणी टोळीत राजकारण्यांची नावं

News Desk

ठाणे अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरसोबत त्याच्या बहिणीचा दीर इकबाल पारकर, मोहम्मद हुसैन ख्वाजा शेख (ड्रग डीलर), फर्नांडो असे आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे.अशी माहिती ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी दिली.

इक्बाल कासकर त्याच्या बहिणीच्या घरी कौन बनगे करोडपती बघत बिर्याणी खात असताना अटक करण्यात आली आहे. इक्बाल कासकर खंडणी रॅकेट चालवत होता. दाऊदच्या खंडणी टोळीत थेट राजकारण्यांची नावं असल्याची शंका परमवीर सिंह यांनी व्यक्त केल्याने, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Related posts

आरोपीची तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या

News Desk

अनिल देशमुखांच्या जावयाला अटक!

News Desk

छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांनी पेटवली प्रवासी बस

News Desk