HW News Marathi
मुंबई

घाटकोपर बस बॉम्बस्फोटातील फरार आरोपीला औरंगाबादमधून अटक

मुंबई | घाटकोपरमध्ये २००२ साली झालेल्या बस बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपीला औरंगाबादमधून अटक करण्यात आले आहे. गुजरात मधील एटीएस पथकाने ही कारवाई केली आहे. स्थानिक एटीएसच्या साहाय्याने गुजरात एटीएसने मंगळवारी ही कारवाई केली. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या अब्दुल रहमान शेख (४३) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.

रहमान शेख आजारी पत्नीला भेटण्यासाठी तो औरंगाबादमध्ये येणार असल्याची माहिती गुजरात एटीएसला मिळाली होती, त्यानुसार स्थानिक एटीएसच्या मदतीने सापळा रचून एका खासगी रुग्णालयातून त्याला ताब्यात घेण्यात आलं. गुजरात एटीएसचे पथक त्याला मुंबई क्राईम ब्रँचच्या ताब्यात देणार असल्याचं समजतं आहे.

घाटकोपरमधील बसमध्ये बॉम्बस्फोट

  • २ डिसेंबर २००२ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बेस्टच्या डेपोतील एका बसमध्ये बॉम्बस्फोट झाला होता.
  • स्फोटात ३२ नागरिक, महिला, मुले जखमी झाले होते.
  • या बॉम्बस्फोटामुळे बेस्टसह सार्वजनिक मालमत्तेचे जवळपास ५ लाख ३३ हजार ६५० रुपयांचे नुकसान झाले होते.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

वांद्रे प्रकरण : आदित्य ठाकरेंच्या ट्विटवर हरभजन सिंहने दिले उत्तर

News Desk

सायन पनवेल महामार्गावर पाण्याची पाईप लाईन फुटली

News Desk

कॉंग्रेस आमदारावर मनसे नेत्याचा पैशांचा पाऊस

Gauri Tilekar
देश / विदेश

करुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंरीत, २ जणांचा मृत्यू ४० जखमी

swarit

चेन्नई | तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्या पार्थिवार थोड्याच वेळात अंत्यसंस्कार करण्यात येईल. मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मरीना बीचवर करुणानिधी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. यांच्या दर्शनस्थळावर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याने चेंगराचेंरी झाली. यात दोन जणांचा मृत्यू झाला असून ४० जण जखमी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीपासून ते काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी बड्या नेते मंडळींनी करुणानिधींचे अंत्यदर्शन घेतले.

द्रविड मुनेत्र कडगम पक्षाचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यसंस्कारावरून वाद सुरू झाला. सीआरझेडच्या नियमानुसार मरीना बीचवर अंत्यसंस्कार होऊ शकत नाही. यानंतर द्रमुकच्या समर्थकांनी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली. द्रमुकने दाखल केलेल्या याचिके विरोध करताना प्रोटोकॉलचा मुद्दा उपस्थित केला गेला. परंतु उच्च न्यायायलाने ही याचिका फेटाळून लावली. आणि करुणानिधी यांचा मरीना बीचवर अंत्यसंस्कार करण्यास परवानगी दिली.

Related posts

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सीआरपीएफचा १ जवान शहीद, १ जखमी

News Desk

अवघ्या चौदा मिनिटांत अमेरिका नष्ट करणार, उत्तर कोरियाची धमकी

News Desk

गांधीजींचा फोटो भारतीय चलनातून काढा | हिंदू महासभा

News Desk