HW News Marathi
देश / विदेश

आयुष्यात एकदा तरी पंढरीच्या वारीला जावे | नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील विविध समस्यांवर देशवासियांशी संवाद साधतात. पंतप्रधान मोदी यांनी आज ‘मन की बात’द्वारे देशवासियांना संबोधित करण्याचा ४६ वा कार्यक्रम होता. कोल्हापूर येथील संतोष काकडे यांनी नरेंद्र मोदींना फोन करून, महाराष्ट्रातील पंढरपूरच्या वारीची माहिती देशवासियांना देण्याची विचारणा केली होती. तेव्हा मोदी यांनी वारीची परंपरा समजावून सांगितली.

विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखोच्या संख्येने वारकरी वारीत सहभागी होतात.संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यासारख्या महान संतांच्या पादुका पालखीत ठेवून वारकरी वारीत सहभागी होतात. संताचे विचार अंधश्रद्धेच्या विरोधात लढण्यासाठी ताकद देतात. महाराष्ट्रातील पंढरपूरमध्ये आषाढ महिन्यात वारी निघते. या वारीत वारकरी पायी प्रवास करत पंढरपूरच्या विठूरायाचे दर्शन घेतात. आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाने वारीचा अनुभव घ्यावा, असे आवाहन नरेंद्र मोदींनी रेडीओच्या माध्यमातून देशवासियांना केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

बलात्कार पीडितेचे मूत्र प्यायला सांगितल्याने आरोपीची आत्महत्या

News Desk

शरद भाऊ ! पवारांनी दिला सुषमा स्वराज यांच्या आठवणींना उजाळा

News Desk

राहुल गांधींचा वाढदिवस राज्यभर ‘संकल्प दिवस’ म्हणून साजरा करणार ! नाना पटोले

News Desk
महाराष्ट्र

Poladpur Bus Accident: आंबेनळी घाटातून ३० मृतदेह बाहेर काढले, शोधकार्य थांबले

swarit

पोलादपूर | महाबळेश्वरला शनिवारी सकाळी सहलीसाठी जात असताना दापोली कृषी विद्यापीठाच्या ३१ कर्मचा-यांची बस आंबेनळी घाटातील आठशे फूट खोल दरीत कोसळून ३० जणांचा जागीच मृत्यू झाला. या सर्वांचे मृतदेह घाटातून बाहेर काढण्यात ट्रेकर्स आणि एनडीआरएफच्या जवांना यश आले असून बचाव पथकाने शोधकार्य थांबवले आहे. या बसमध्ये एकूण ३१ जणांपैकी ३० जणांचा मृत्यू झाल तर, एक जण सुदैवाने बचावला. हे सर्व जण दापोली कृषी विद्यापीठाच्या कर्माचारी होते.

कोकण कृषी विद्यापीठातील चार अधीक्षक सहलीला गेले होते. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला. त्याशिवाय चार सहाय्यक अधीक्षक, नऊ वरिष्ठ लिपीक, ११ कनिष्ठ लिपीक, एक लॅबबॉय आणि दोन चालकांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात बचावलेले प्रकाश सावंत-देसाई हे कोकण कृषी विद्यापीठचे अधीक्षक असून खोल दरीतूनवर आले. त्यानंतर मोबाईलला रेंज मिळाल्यानंतर कोकण कृषी विद्यापीठाला फोन करून त्यांनी अपघाताची माहिती दिली.

अपघातातील मृतांची नावे

पंकज कंदम, प्रमोद शिगवण, सचिन गिम्हवणेकर, जयंत चौगुले, सुयश बाळ, संदिप झगडे, संदिप सुवरे, रत्नाकर पागडे, राजाराम गावडे, राजेंद्र रिसबूड, राजेश सावंत, राजु बंडवे, हेमंत सुर्वे, रोशन तबीब, निलेश तांबे, सुनिल साटले, सुनिल कदम, रितेश जाधव, किशोर चौगुले, संतोष जालगावकर, विक्रांत शिंदे, दत्ताराम धायगुडे, प्रमोद जाधव, विनायक सावंत, संदिप भोसले, प्रशांत भाविड,संजीव झगडे, सचिन गुजर, संतोष झगडे, सचिन झगडे या आपघातात मृत झालेल्या ३० जणांची नावे आहेत.

Related posts

मित्रपक्षांचं काही माहित नाही पण आगामी निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार – नाना पटोले

News Desk

महाविकास आघाडी सरकारच्या नियोजनशून्य ‘सहकाराचा’ आणखी एक अंक-  अतुल भातखळकर

News Desk

नानाच्या नाना तऱ्हा!! ‘सकाळी आयसोलेशन अन् रात्री सेलिब्रेशन!, भाजपचा टोला

News Desk